सुबोध भावे यांच्या सुपरहिट “विजेता” चित्रपटानंतर, आज अजून एका नव्या सिनेमाचा नाव जाहीर झाले. सुबोध भावे दिग्दर्शित मारवा “मारवा” ह्या चित्रपटाचे नाव जाहीर करत वैभव जोशी यांनी एक सुरेख कविता देखील लिहिली आहे.
मनातलं गूज, डोळ्यांतलं पाणी
अबोलीच्या वाटेवर, चाफ्याची निशाणी
भेटींचे तराणे, चुकामुकींची विराणी
“मारवा”
एक हुरहूर लावणारी कहाणी.
ह्या कवितेच्या माध्यमातून “मारवा” चित्रपटाचे अतिशय सुंदर प्रकारे वर्णन केले आहे. लेखक वैभव जोशी व निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांच्या सह सुबोध भावे यांनी दिग्दर्शन केले आहे. कविते प्रमाणे खरंच ह्या चित्रपटाची सर्व प्रेक्षकांना हुरहूर लागली आहे.