बॉलीवूडमधील अनेक जोडप्यांमधील लग्नापर्यंत घेऊन जाणारे अतूट प्रेम आणि घटस्फोटामुळे नात्यात आलेला दुरावा, हे सर्व चाहतावर्ग पाहत आलेला आहे. अशाच जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आहेत. या जोडप्याने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची माहिती प्रेक्षकांना दिली. आता दोघेही भूतकाळ मागे सोडून त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ या शोमध्ये नुकतेच नागा चैतन्य आणि समंथाने त्यांच्या नात्याबद्दल काही गोष्टींचा उलगडा केला आहे. शोमध्ये करण जोहरने नागा चैतन्यला ‘पहिली पत्नी समंथा रुथ प्रभूला भेटल्यावर तुझी प्रतिक्रिया कशी असेल?’ असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना नागा चैतन्य म्हणाला, ‘मी कधी तिला भेटलो तर, तिला Hi बोलेल आणि मिठी मारेल…
तसेच याच शोमध्ये समंथाला विचारण्यात आले की ‘नागा चैतन्य साठी तुझ्या मनात हार्ड फिलिंग्स आहेत का?’ तेव्हा समंथा म्हणाली, ‘होय, हार्ड फिलिंग्स आहेत. जर तुम्ही आम्हा दोघांना एका खोलीत बंद केले, तर तुम्हाला आमच्यापासून धारदार गोष्टी लपवाव्या लागतील. सध्या परिस्थिती चांगली नाही. कदाचित भविष्यात काहीतरी बदल घडेल…
आणखी एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर मात्र नागा चैतन्य निराश दिसला, तेव्हा नागा चैतन्य म्हणाला की, ‘मी एक अभिनेता आहे. म्हणून मला वाटतं की, लोकांनी माझ्याबद्दल बोलावं, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करू नये. आपल्या प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं…’