झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत प्रार्थना बेहरे(नेहा), श्रेयस तळपदे(यश), मायरा वायकुळ(परी) हे सगळे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. प्रेक्षकांनी या कलाकारांना खूप पसंती दिली आहे. या मालिकेमध्ये आता एक नवा ट्विस्ट येणार असून ही मालिका आता एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी नेहाचा पहिला नवरा अविनाश असल्याचे सत्य समोर आले. अविनाश हा पहिला नवरा आहे हे सत्य नेहाने यश पासून लपवले होते. त्यामुळे यश आणि नेहा यांच्यात दुरावा आला. म्हणून नेहा पॅलेस सोडून चाळीत रहायला परत गेली होती. पण अविनाशचा खरा चेहरा यश समोर आल्याने मालिकेला एक वेगळं वळण आलं आहे. नेहा आणि परी आता पुन्हा चाळ सोडून पॅलेस वर जाताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा शेवटचा भाग १७ सप्टेंबरला प्रसारित होणार होता, मालिकेचं शूटींग देखील संपलं होतं. पण ही मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षकवर्ग नाराज झाला. मालिकेला मिळणारी प्रेक्षकांची पसंती बघून आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
मालिकेच्या शूटींगला देखील आता पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. यावरून दिसून येते की या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेच्या जागी रात्री ८:३० ला ‘दार उघड बये’ ही मालिका येत आहे. तर १९ सप्टेंबर पासून संध्याकाळी ६:३० वाजता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका आता एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.