सध्या मराठी चित्रपट सृष्टीत असलेल्या ऐतिहासिक लाटेवर सर्वांनाच स्वार होण्याची इच्छा आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ ‘शिवप्रताप गरुडझेप’ ‘हर हर महादेव’ यांसारख्या मराठी चित्रपटानंतर नुकताच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा पहिला लूक सादर करण्यात आला. त्यामध्ये असलेल्या सात मावळ्यांपैकी एक मावळा
वीर दत्ताजी पागे यांची भूमिका महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर यांनी केली आहे. पहिला लूक जेव्हा सादर करण्यात आला तेव्हा त्याची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर त्याच्या हावभाव आणि बोलण्याच्या पद्धतीवरून नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवत त्याला ट्रोल करायला सुरवात केली आहे. त्या काळातील मावळे कसे होते आणि ते तसेच असतील का?
तुम्हाला काय वाटत, खरंच इतिहासाचं विद्रुपीकरण व्हायला लागलंय का? आपण प्रतिक्रिया देण्यात जरा घाई करतोय का? चित्रपट येईपर्यंत आपण वाट पाहणे चुकीचं ठरणार आहे? लैंगिकता आणि इतिहास हे दोन प्रश्न एकत्र केले जात आहेत का?
आपल्याला याबद्दल काय वाटतं? व्यक्त व्हा.