साउथ इंडस्ट्रीने आताच्या काळात सुपरहिट ठरणारे सिनेमे दिले आहेत.
आपण बघत आलो आहोत जेव्हा जेव्हा कोणत्याही कलेतून परंपरेचा, लोककलेचा वारसा या गोष्टींविषयी लिहिले जाते तेव्हा लेखक, दिग्दर्शक किंवा कलाकार यांच्या माध्यमातून तो वास्तवाचा विस्तव आपल्याला चटका देऊन जातो आणि आपल्याला सुन्न केल्याशिवाय राहात नाही. आज अशाच एका सिनेमा बद्दल आपण बोलणार आहोत.
साउथ इंडस्ट्रीने आताच्या काळात सुपरहिट ठरणारे सिनेमे दिले आहेत. ‘७७७ चार्ली’, केजीएफ, पुष्पा सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे साउथ सिनेमांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार झला आहे. अशाच अजून एका चित्रपटाची यात भर पडली आहे. सिनेमातून कायमच वेगळा विषय मांडणाऱ्या रिषभ शेट्टी यांच्या ‘कांतारा: अ लेजंड’ ची. हा चित्रपट मूळ तेलगु आणि हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. अनेक कारणांमुळे चर्चेत असलेल्या कांताराला मिळालेली प्रसिद्धी काही औरच आहे. या सिनेमा बद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. याची कथा नेमकी कुठली? महाराष्ट्रातील परंपरेचा या कथेशी काही संबंध आहे का? याबद्दल सुद्धा अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या. त्यातच या सिनेमातील वराहरुपम गाण्यावर घेतलेल्या आक्षेपामुळे प्रेक्षकांच्या मनात याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. त्यातच आता या सिनेमाबद्दल आणखी एक महत्वाची बाब पुढे आली आहे.
रिषभ शेट्टीने यांनी पहिल्यांदा लीड रोल साठी पुनीथ राजकुमार यांची निवड केली होती. रिषभने सांगितलेली कांताराची स्टोरी ऐकून आपणही हा सिनेमा करायला हवा अस पुनीथ यांना वाटलं. वेळ मिळेल मिळेल अस करता करता शेवटी पुनीथ यांनी ‘तुझ्या चित्रपटासाठी या वर्षी तरी वेळ मिळणे कठीण आहे’ अस रिषभला सांगितलं. अस सांगताना ते हे सुद्धा म्हणाले की, ‘एवढी चांगली स्टोरी लाईन असताना फक्त मी नाही म्हणून काम थांबवू नकोस. माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहेत’. पुढे रिषभ यांनी या चित्रपटाची शुटींग सुरु केली. शूटिंगचे काही फुटेज रिषभ यांनी पुनीथ राजकुमार यांना दाखवले होते. ते पाहून पुनिथ यांनी रिषभला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या. पण दुर्दैवाने थोड्याच दिवसात पुनीथ राजकुमार यांचे निधन झाले.अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
कांतारा या कमी बजेट असलेल्या चित्रपटाची आयएमडीबी रेटिंग ९.१ च्या वर दिले गेले आहे. या रेटिंग मध्ये या चित्रपटाने केजीएफ ला देखील मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. आयएमडीबीने २५० सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी जाहीर केली होती. त्यात देखील हा चित्रपट सर्वोच्च स्थानी आहे आणि यातील अजून मजेदार गोष्ट म्हणजे या यादीत ८० % साउथ इंडस्ट्री मधले चित्रपट आहेत.