नटरंग,टाईमपास,बालगंधर्व आणि बॅंजो सारख्या विविध ढंगी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक यांची नवीन फिल्म येतीये आणि त्यात
एक अष्टपैलू कलाकार आणि एक बहुरंगी आणि बहुढंगी दिग्दर्शक आता एकत्र येणार आहेत आणि ही जोडी काय धमाल करते हे पाहण्यासारखे आहे.आपण बोलत आहोत आगामी ‘अटल’ या फिल्म विषयी या फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी असून याचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत.
२०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार या घोषणेसह निर्माता विनोद भानुशाली यांनी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते.
“मै रहू या ना रहू ये देश रहना चाहिए” या अटल बिहारी यांचे हे वाक्य पोस्टर वर देण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी असणार असल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आहे.या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रवी जाधव यांच्यावर दिली आहे.नुकतेच रवी जाधव यांनी चित्रपटाच्या टीम सोबतचे फोटोज सोशल मिडिया वर शेअर केले आहेत.रवी जाधव यांची ही बॉलीवूड मध्ये दिग्दर्शन करण्याची दुसरी वेळ आहे.
बॅंजो या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचे पहिले पाऊल टाकले.हा चित्रपट म्हणावा तसा हिट ठरला नसला तरी या चित्रपटासाठी रवी जाधव यांचे कौतुक केले आहे.येत्या चित्रपटाच्या पोस्ट वर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
नटरंग,टाईमपास,बालगंधर्व आणि बॅंजो सारख्या विविध ढंगी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक यांची नवीन फिल्म येतीये आणि त्यात
एक अष्टपैलू कलाकार आणि एक बहुरंगी आणि बहुढंगी दिग्दर्शक आता एकत्र येणार आहेत आणि ही जोडी काय धमाल करते हे पाहण्यासारखे आहे.आपण बोलत आहोत आगामी ‘अटल’ या फिल्म विषयी या फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी असून याचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत.
२०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार या घोषणेसह निर्माता विनोद भानुशाली यांनी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते.
“मै रहू या ना रहू ये देश रहना चाहिए” या अटल बिहारी यांचे हे वाक्य पोस्टर वर देण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी असणार असल्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आहे.या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रवी जाधव यांच्यावर दिली आहे.नुकतेच रवी जाधव यांनी चित्रपटाच्या टीम सोबतचे फोटोज सोशल मिडिया वर शेअर केले आहेत.रवी जाधव यांची ही बॉलीवूड मध्ये दिग्दर्शन करण्याची दुसरी वेळ आहे.
बॅंजो या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचे पहिले पाऊल टाकले.हा चित्रपट म्हणावा तसा हिट ठरला नसला तरी या चित्रपटासाठी रवी जाधव यांचे कौतुक केले आहे.येत्या चित्रपटाच्या पोस्ट वर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.