जगातील सर्वात श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार. या पुरस्काराची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. १२ मार्च २०२३ रोजी ऑस्कर विजेत्या चित्रपटांची घोषणा होणार आहे, या वर्षी ऑस्कर साठी भारतातून ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाला नामांकन देण्यात आले आहे.
RRR आणि काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटाकडून जरी अपेक्षा असतील तरी ‘छेल्लो शो’ या चित्रपटाने भारतातून अधिकृत प्रवेश नोंदवला आहे. या आधी देखील अनेक चित्रपट ऑस्कर साठी पाठवण्यात आले आहेत.
1. मदर इंडिया १९५७
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी ऑस्करसाठी नामांकन मिळालेला मदर इंडिया हा पहिला भारतीय चित्रपट होता. मेहबूब खान दिग्दर्शित आणि राज कुमार, नर्गिस, सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार अभिनीत, मदर इंडिया हा औरत (1940) चित्रपटाचा रिमेक होता.
2. सलाम बॉम्बे १९८८
मीरा नायरचा 1988 चा भारतीय ड्रामा चित्रपट सलाम बॉम्बे हा ऑस्करसाठी नामांकन मिळालेला दुसरा भारतीय चित्रपट ठरला. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचे दैनंदिन जीवन या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. बॉम्बेतील रस्त्यावरच्या मुलांच्या भावनेतून आणि त्यांच्या जीवनशैलीतून या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. या चित्रपटाला 61 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते.
३. लगान (२००१)
2001 सालचा आशुतोष गोवारीकर लिखित आणि दिग्दर्शित हिंदी भाषेतील स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट होता. आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ऑस्करसाठी भारताचा तिसरा सिनेमा होता. लगान हा ब्रिटिशराजवटीच्या उत्तरार्धातील सिनेमा आहे. हा चित्रपट ग्रामस्थ आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यातील क्रिकेट सामन्याबद्दल आहे.
४. बर्फी २०१२
रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा आणि इलियाना डीक्रूज यांचा ‘बर्फी’ हा सिनेमा ऑस्कर पुरस्कारासाठी भारतानं पाठवल होता. चित्रपटात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या दोन व्यक्तींमधली प्रेमाची कहाणी खूप सुंदर रितीने चित्रीत करण्यात आली होती.
५. गली बॉय २०१९
‘अपना टाईम आयेगा’ असं म्हणतं सर्वच रॅप बनवणाऱ्या तरुणांच्या गळयातील ताईत बनलेला चित्रपट म्हणजे गली बॉय या चित्रपटाची 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून निवड करण्यात आली होती.
या आधी देखील मधुमती(१९५८), अपूर संसार (१९५९), गाईड (१९६५), सारांश (१९८४), नायकन (१९८७), परिंदा (१९८९), अंजली (१९९०), हे राम (२०००), देवदास (२००२), रुदाली(१९९३) पीपली लाइव (२०१०) यांसारखे चित्रपट ऑस्कर साठी नामांकित झाले आहेत. पण आता पर्यंतएकही भारतीय चित्रपट ऑस्कर पुरस्कारचा मानकरी होऊ शकला नाही.