अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं नाव ऐकले की आपसूकच आठवण येते ती, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची. अनेक वर्षे या शोमधून विशाखा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे. त्यांच्या कामाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
ज्या शोमधून अभिनेत्री घराघरांत पोहोचली होती. त्याच शोचा काही दिवसांपूर्वी विशाखाने निरोप घेतला. त्या पुन्हा या शोमध्ये दिसतील अशी आशा तिच्या चाहत्यांना वाटत होती. परंतू मागील काही दिवसात तसे काहीही झाले नाही. याउलट त्यांच्यपाठोपाठ ओंकार भोजने या हास्यविराने देखील हा शो सोडला.
कलाकारांच्या निरोपावर चॅनेल किंवा शोकडून कोणतेही भाष्य समोर आले नाही. परंतू विशाखा यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांची एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी अनेक लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
तर काही चाहत्यांनी त्या हास्यजत्रेत कधी परतणार असा प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी अगदी थोडक्यात उत्तर दिले की, ” नाही, आता सध्या तरी हातात वेगळे प्रोजेक्ट आहेत.” यावरून त्या पुन्हा शोमध्ये परतण्याची शक्यता जवळपास संपुष्टातच येते.
असे असूनही विशाखा यांना हास्यजत्रेच्या मंचावर पाहण्याची फार इच्छा आहे. दुसरीकडे विशाखा स्टार प्रवाहवरील नवीन नवीन मालिका ‘शुभविवाह’ या मालिकेत आणि ‘कुर्रर्रर्र’ या नाटकात व्यस्त आहेत.