लग्नसोहळा म्हणजे खूप धुमधडाक्यात व आनंदात साजरा करणारा सोहळा त्यात सेलिब्रिटी लोकांचा लग्न तर खूप वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या पद्धतीने पार पडतात. लग्न म्हंटल म्हणजे त्यात अनेक विधी होतात खूप पाहुणे मंडळी देखील येतात. नवरीला प्रत्येक विधीसाठी वेगवेगळ्या साड्या व दागिने घेतले जातात.
तसेच झी मराठी वरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमधील अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्या लग्ना बद्दलच्या काही खास गोष्टी तिने एका मुलाखतीमध्ये सांगीतल्या आहेत. अभिनेत्री शिवानी व अभिनेता विराजस यांचा विवाह गेल्यावर्षी ३ मे ला अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पार पडला. विराजस हा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.
सध्या शिवानी काम करत असलेल्या मालिकेत देखील तिच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. या मालिकेमध्ये तिने अक्षराची भूमिका म्हणजेच मास्तरीण बाईची भूमिका साकारली आहे. मालिकेत तिची सासू अगदीच कठोर असली तरी रिअल लाइफमध्ये तिने अगदी सोनपरीलाच आपली सासू बनवली आहे. या मालिकेनिम्मित ती पहिल्यांदाच अभिनेता ऋषिकेश शेलार सोबत स्क्रिन शेअर करत आहे.
शिवानी व विराजसच लग्न गेल्यावर्षी पुण्यात पार पडल त्यांच्या जवळच्या मित्र मंडळींनी व कुटुंबीयांनी त्यांच्या लग्न सोहळ्यात हजेरी लावली होती. लग्नातील दोघांचा लूक खूपच खास होता. लग्नातील त्यांचे काही फोटो देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. लग्नातील एक खास गोष्ट म्हणजे शिवानीने संपूर्ण लग्न सोहळ्यात एकच साडी नेसली होती व विराजस ने देखील एकच शेरवानी घातली होती.
याबद्दल तिने लोकमत चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ती असं म्हणते कि, “मी माझ्या खऱ्या आयुष्यातील लग्न फक्त अर्धा तासात तयार होऊन बाहेर आले. माझं आधीच ठरलेलं की मी लग्नातल्या कोणत्याही विधींसाठी साड्या बदलत बसणार नाही. किंबहुना सेटवर सुद्धा मी खूप पटकन तयार होते त्यामुळेच मला माझ्या लग्नात सुद्धा पटकन तयार व्हायचे होते. माझ्या मते, लग्नामध्ये नवरा नवरींना नातेवाईक मित्रमंडळी भेटायला येतात, छान विधी सुरू असतात, घरच्यांशी नातेवाईकांशी तुम्हाला बोलायचे असते, सगळ्या सोहळ्याचा आनंद घ्यायचा असतो. अशातच जर नवरा नवरी कपडे बदलण्यासाठी दोन दोन तास वेळ घेत असतील आणि बाहेर सर्वजण त्यांची वाट बघत असतील. तर ते बरं वाटत नाही आणि मला ते आवडत नाही, मला स्वतःला या गोष्टीचा कंटाळा येतो.”