भारतीय सिनेसृष्टीत असे काही कलाकार आहेत, की ज्यांचे सिनेमे पाहण्यासाठी संपूर्ण देश आसुसलेला असतो. त्यात माधुरी दिक्षित, अमिताभ बच्चन, संजय दत्त, अनिल कपूर, सुनील शेट्टी, अनुपम खेर, शिल्पा शेट्टी यांसारख्या अनेक कलाकारांची नावं आहेत.
पण सध्या या कलाकारांचे सिनेमे येणं म्हणजेच कलाकारांचं काम करणं कमी झालं आहे. त्यामुळे त्यांना सिनेमात पाहायचं असेल तर त्यांचे जुनेचं सिनेमे त्यांच्या चाहत्यांना पाहावे लागतात. पण यांपैकी बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांना आपण लवकरच रुपेरी पडद्यावर पाहू शकणार आहोत. पण कोणत्या नव्या सिनेमात नाही तर जुन्याच सिनेमात. याचा अर्थ त्यांचा जुना सिनेमा पुन्हा पडद्यावर दाखवणार असा नाही तर काही वर्षांपूर्वी शूट झालेला सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
काही सिनेमांमध्ये प्रदर्शनापूर्वी अडचणी येतात, हे आपणास ठाऊकचं आहे. तसंच काहीसं या सिनेमाचे सुद्धा झाले. ९० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा तब्बल १२ वर्षांपासून रखडला आहे. तर हा बहुप्रतीक्षित असलेल्या सिनेमाचे नाव आहे ‘शूबाइट.’ दिग्दर्शक शूजीत सिरकार यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा गेली १२ प्रतीक्षेत आहे. पिकं, विकी डोनर, पिकू यांसारख्या अनेक सिनेमाचे दिग्दर्शन शूजीत सिरकार यांनी केले आहे. पण हा सिनेमा त्यांच्यासाठी खूपच खास होता. तर हा सिनेमा खास असण्यामागे त्याचे कारणही तितकेच खास होते. शूबाइट या सिनेमात खुद्द अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत आहेत.
तर शूबाइट हा सिनेमा २०१२ मध्ये तयार करण्यात आला. परंतू सिनेमाच्या टीममधील अंतर्गत वादामुळे तेव्हा हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. रॉनी स्क्रूवाला यांच्या यूटीव्ही मोशन पिक्चर्स कंपनीने शूबाइटची सुरुवात केली होती. ज्यासाठी प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माता दिग्दर्शक मनोज नाईट शामलन यांनी या सिनेमाची कथा लिहिली होती. त्यांनी यूटीव्हीला तो बनवण्याची परवानगी दिली पण नंतर त्यांनी तो इंग्रजीतच बनवण्याचा निर्णय घेतला आणि आधी इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होईल आणि त्यानंतर हिंदी असा पवित्रा त्यांनी घेतला. तेव्हापासून हा चित्रपट अडकला आहे.
बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या एका रिपोर्टनुसार सिनेमाचे दिग्दर्शक यांनी नुकतेच शूबाइट या सिनेमाबद्दल भाष्य केले. तेव्हा ते म्हणाले की, “शूबाइट हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचा आहे. अमिताभ यांच्यासोबतचा हा माझा पहिला सिनेमा आहे. माझी खूप इच्छा आहे की मी तुम्हाला दाखवावं की अमितभ यांनी त्या पात्राला कसा न्याय दिला आहे. अमिताभ हे त्यांच्या डायलॉग डिलीव्हरीसाठी ओळखले जातात. पण या चित्रपटात अमिताभ काहीही बोलले नाहीत. पण सध्या आम्ही वाद मिटवण्याचा प्रयत्न करतोय. मला आशा आहे की, हा चित्रपट लवकरच आम्ही प्रदर्शित करु.”
त्यामुळे आता चाहते प्रचंड खुश असून ते अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.