काल झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला असला तरीसुद्धा इंडियन टीमने अतिशय उत्तम पद्धतीने हा सामना खेळला. तसेच टीम इंडियाचा पराभव झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सलग दहा सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेली रोहित शर्माची टीम ऑस्ट्रेलिया कडून हरली.
टीम इंडियाचा अंतिम फेरीत पराभव झाल्यामुळे भारतीय प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सुर उमटला. भावूक झालेल्या खेळाडूंना पाहून समस्त भारतीयांचेही डोळे पाणावले. अशातच सेलिब्रिटींनी खेळाडूंची पाठराखण करत त्यांना सपोर्ट करत सेलिब्रिटींनी खेळाडूंसाठी आपल्या सोशल मीडियावर काही प्रतिक्रिया दिल्या. ते पाहून चाहत्यांमधील देखील नाराजी कमी होऊन, भारतीय संघाच्या मेहनतीसाठी आणि खेळाडू वृत्तीसाठी अभिमानाने मान उंचावली आहे.
जितेंद्र जोशी यांनी देखील पोस्ट शेअर करत टीम इंडियाबद्दल लिहिले की, “आता पराभवानंतर काहीजण आपल्या संघाबद्दल वाईट कमेंट करतील, त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा करतील, टीका करतील, काही नेटकऱ्यांनी तर आधीच बालिश मिम्स बनवले आहेत. पण, या सगळ्यात सीरिजमध्ये आपल्या संघाने उत्तम कामगिरी केली हे आपण विसरुन चालणार नाही. आपल्या टीमचा मला प्रचंड अभिमान आहे. कारण, एकही सामना न गमावता त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. आपण यंदा जिंकू असा विश्वास आपल्यात निर्माण केला, आपल्याला स्वप्न दाखवली. आपण सगळेच प्रेक्षक आणि कुटुंब म्हणून एकत्र खेळलो.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “शेवटी हा एक खेळ आहे. कोणाला एकला जिंकण्यासाठी कोणाला तरी हार मानाविच लागते हा दिवस जरी आपला नसला तरी सुद्धा आपली टीम खूप छान खेळली आहे. आता मी दु:खी आहे. पण, त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही. त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्या सगळ्यांच्या वतीने ते मैदानात खेळले. या विश्वचषकात आपण उत्तम ठरलो नाही याचा अर्थ आपण हरलोय असा होत नाही. माझं माझ्या टीमला कायम पाठिंबा आहे. मी कायम त्यांच्या सोबत आहे.”
दरम्यान, टीम इंडियाला सपोर्ट करत जितेंद्रने ऑस्ट्रेलिया संघाच देखील अभिनंदन केले. तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं खेळलात, असेही त्याने लिहिले. जितेंद्र जोशी प्रमाणेच अनेक मराठी कालाकारांसह बॉलिवूड स्टार्सनेही सोशल मीडियावर व्यक्त होत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनेता अभिषेक बच्चनने ट्वीटर वर लिहिले की, “चांगल्या प्रयत्नानंतर एक कठीण पराभव. संपूर्ण निळ्या रंगातील पुरुषांची प्रशंसनीय कामगिरी. तुम्ही आमची मान अभिमानाने उंचावलीय. या प्रवासासाठी धन्यवाद. #TeamIndia #CWC23.”
A tough loss after a valiant effort. Commendable performance by the men in blue throughout. Hold your heads high and thank you for the journey. 🇮🇳💪🏽#TeamIndia #CWC23
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) November 19, 2023
तसेच चित्रपट निर्माते दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ट्वीटर वर लिहिले, “अभिनंदन ऑस्ट्रेलिया. चांगला खेळला, भारत.”
Congratulations Australia.
Well played India.— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 19, 2023
अभिनेता सोनू सूदने स्टोरी पोस्ट करत लिहिले की, “टीम इंडिया तुम्ही आमचे कायमचे हिरो आहात #teamimdiafinal #team India.”
Team India Our Heroes Forever❤️
#TeamIndiainFinal 🇮🇳— sonu sood (@SonuSood) November 19, 2023
अभिनेत्री काजोलने स्टोरीज पोस्ट करत लिहिले की, “हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं! टीम इंडिया चांगली खेळली. ऑस्ट्रेलियाचे आणखी एका विश्वचषकासाठी अभिनंदन! #worldCup फायनल.”
हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!
Well played team India 🇮🇳
Congratulations Australia on another World Cup!#CWC23Final #INDvsAUS #WorldcupFinal #BleedBlue pic.twitter.com/KsCK9BHLdf— Kajol (@itsKajolD) November 19, 2023
अभिनेता आयुष्मान खुरानाने अभिनेता रणवीर सिंग आणि क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, “पराजयाबद्दल खूप वाईट वाटले पण या भारत – ऑस्ट्रेलियामध्ये टक्कर होणे चांगले होते.”
आशा प्रतिक्रिया देत आपल्या लाडक्या कलाकारांनी इंडिया टीमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.