‘ऑस्कर’ हा कलाविश्वातील सर्वाधिक मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. कला क्षेत्रात काम करणारा कलाकार लहान असो वा मोठा प्रत्येकाचीच इच्छा असते की, आपल्या कारकिर्दीत एकदा तरी हा सर्वोच्च पुरस्कार आपल्या नावे व्हावा. यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताने बाजी मारली आहे. २०२३ मध्ये भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.
एसएस राजमौली यांच्या आरआरआर सिनेमातील ‘नाटू-नाटू’ या गाण्यासाठी आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स‘ ही शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म यंदाचे ऑस्कर पुरस्काराचे विजेते ठरले आहेत. या पुरस्काराचे नाव पडले ते एका व्यक्तीच्या नावावरूनच. या अकादमीच्या कार्यकारी संचालिका मार्गारेट यांनी जेव्हा ही ट्रॉफी पाहिली तेव्हा त्यांना ती त्यांचे अंकल ऑस्कर यांच्यासारखी वाटली आणि त्या काकांवर त्यांचे खूप प्रेम होते, म्हणून त्या ट्रॉफीस शेवटी ऑस्कर हे नाव पडले.
View this post on Instagram
सर्वाधिक मानाचा पुरस्कार म्हणजे त्याची किंमतही तितकीच मोठी असणार, तो पुरस्कार नक्कीच सोन्याचा असेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत असतात. त्याचे कारण म्हणजे या पुरस्काराची ट्रॉफी अगदी सोन्यासारखी दिसते. परंतू ही ट्रॉफी सोन्याची नसून तांब्याची आहे आणि या तांब्याच्या ट्रॉफीवर २४ कॅरेट सोन्याचा थर बसवलेला असतो. या ट्रॉफीचे वजन ४५० ग्रॅम आहे. तर त्याची किंमत ही फक्त १ डॉलर आहे म्हणजेच सुमारे ८२ रुपये. या पुरस्काराची किंमत कितीही कमी असली तरी तो पुरस्कार कधीच विकला जाऊ शकत नाही किंवा विकतही घेऊ शकत नाही.
१६ मे १९२९ मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. तर आजही खूप दिमाखात हा सोहळा पार पडत असतो. महत्त्वाचे म्हणजे या ट्रॉफीसह रोख रक्कम दिली जात नाही. परंतू ही ट्रॉफी मिळाल्यावर आपसूकच विजेत्यांची संपूर्ण जगभरात किंमत वाढते. पण या ट्रॉफीसह विजेत्यांना एक खास गिफ्ट मिळते, ज्यात हजारो वस्तूंचा समावेश असतो.
हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर फक्त विजेत्यांचे नावलौकिक होत नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीचे आणि देशाचे नाव जगभरात गाजते.