आपल्या सुमधुर स्वरांनी अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वरसम्राज्ञी आशाताई यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली सात दशके आशाताईंनी आपल्या गाण्यांनी सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे. काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी त्याच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतरत्न दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अनेक नेते मंडळी उपस्थित होती.
आशाताईंचा जन्म १९३३ साली पुण्यात झाला. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आशा भोसले यांनी त्याचं पाहिलं गाण १९४३ मध्ये रेकॉर्ड केल. तिथून त्यांच्या कारकिर्दीला सुरवात झाली. आशाताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत, ज्यात त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत.
काल ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या दरम्यान आशाताईंना अनेक प्रश्न विचारण्यात आले. अभिनेता सुमित राघवन यांनी आशाताईंची मुलाखत घेतली. या सुमित राघवन यांनी आशाताईंना विचारले की, “१९४३ साली तुम्ही मराठीतील पहिलं गाणं गायलात, १९४६ साली तुम्ही हिंदीतील पहिलं गाणं गायलात, तुम्ही एकूण १२ हजार गाणी गायलात ही खूपच मोठी गोष्ट आहे. एखादं गाणं गाताना किंवा आधी तुम्हाला अंदाज येतो का की हे गाणं खूप चालेल किंवा चालणार नाही.”
यावर आशाताई उत्तर देत म्हणाल्या, “हा अंदाज देवाला सुद्धा आलेला नाही, की मी जो माणूस जन्माला घालतोय त्याचं पुढे काय होणार आहे. तो कोण होणार? फिल्म इंडस्ट्रीतील लोक हल्ली ४०० कोटींची फिल्म बनवतात. सहा महिने स्टोरीवर काम करतात, सहा महिने स्क्रिप्टवर काम करतात, सहा महिने डायलॉग लिहिण्यातही घालवतात, त्यानंतर त्यांचा पिक्चर बनवता आणि सांगतात की माझा पिक्चर हिट होणार, पण खरं पाहता त्यातून त्यांना २०० कोटीही वसूल होत नाहीत. असं बरेच वेळा होता. त्यामुळे कोणतं गाणं चालणार हे आधीच सांगणं कठीण आहे. आम्हाला काही वेळा वाटतं एखादं गाणं खूप सुंदर आहे, पण पब्लिकला वेगळंच काहीतरी वाटतं. त्यांचा मूड वेगळा असतो.”
आशाताईंनी आता पर्यंत हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत.अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आल आहे. अशा या महान गायिकेला मानाचा मुजरा.