मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेश सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असतो. त्याचे फोटोज् व्हिडिओज् आणि प्रामुख्याने फनी व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
रितेश नुकताच ‘प्लान ए आणि प्लान बी’ या चित्रपटात अभिनेत्री तमन्नासोबत झळकला. त्याचा हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. आता तो पुढील मराठी सिनेमा ‘वेड’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश स्वतः करणार आहे.
काही महिन्यांपासून बॉलिवूड चित्रपटांबाबत नेटकऱ्यांमध्ये बॉयकॉट ट्रेंड सुरु आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांबद्दल प्रेक्षक वर्गात नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे चित्रपटातील चुका काढत प्रेक्षक चित्रपटास बॉयकॉट करीत आहेत. परंतू हा ट्रेंड मोडून काढण्यासाठी आलिया आणि रणबीरने त्यांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटासाठी आणि त्याच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतली. पण तरी सुद्धा हेच वातावरण दिसून आले. त्यांनतर थँक गॉड आणि आदिपुरुष या चित्रपटांनादेखील बॉयकॉट म्हणत ट्रोल केल जात आहे.
View this post on Instagram
अनेक कलाकारांनी आतापर्यंत बॉयकॉट ट्रेंडला विरोध केला आहे. यामध्ये मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचीही भर पडली आहे. त्याने या सर्व वादाबद्दल एक मोठं विधान केलं आहे.
रितेश म्हणाला की, “युजर्सनी बहिष्कार टाकल्याने काही फरक पडत नाही. त्याचप्रकारे सोशल मीडियावर ट्रेंड चालवल्याने चित्रपटाला काही फरक पडत नाही. चित्रपटाचा आशय चांगला असेल तर चित्रपट नक्कीच चालतो. लोकांना कथा आवडली पाहिजे. काही काळ चित्रपट चालले नाहीत, यामागे आशय हे एक मोठे कारण आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट याचे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे रितेशने सांगितले. काही काळ चित्रपट चालत नव्हते. पण सर्व बहिष्काराच्या ट्रेंडनंतरही ब्रह्मास्त्र चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. यावरून हे सिद्ध होते की जर कंटेंट चांगला असेल तर बॉयकॉट ट्रेंडमध्ये फारसा फरक पडत नाही, .”
तसेच तो पुढे म्हणाला की,”आता लोकांकडे ऑनलाइनसह भरपूर कंटेंट आहे. पण लोक चित्रपट तेव्हाच पाहतात जेव्हा त्यांच्या कथेत ताकद असते. ब्रह्मास्त्रने पहिल्या आठवड्यात उत्तम कामगिरी केली कारण लोकांना त्या सिनेमाची कथा आवडली होती. लोकांना कथा आवडली तर चित्रपट नक्कीच चालतो. कोरोना नंतर परिस्थिती खूप सुधारली आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशाने लोकांच्या आशा उंचावल्या आहेत. बर्याच काळानंतर ब्रह्मास्त्रने चांगली कमाई केली आहे. इतरांच्या यशावरही आपण आनंदी असायला हवे. चित्रपटाने चांगला व्यवसाय केला याचा मला आनंद आहे. लोक पुन्हा एकदा रंगभूमीवर परतले आहेत. हे पाहणे हा एक उत्तम अनुभव आहे.”