छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. तर या मालिकांपैकी एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ठिपक्यांची रांगोळी.’ ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असून एकत्र कुटुंब असणे किती महत्वाचं आहे, हे या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मागील काही महिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवत असतात. त्यातील काही मालिका चांगल्या कथानकासह वर्षानुवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात तर काही मालिका कथानक संपल्याने लवकरच प्रेक्षकांच निरोप घेत असतात. तसेच गेल्या महिन्याभरात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘रंग माझा वेगळा‘, ‘स्वाभिमान’ या मालिकांच्या पाठोपाठ स्टार प्रवाह वाहिनीवरील आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
हे देखील वाचा: वाह! जुईच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने टीआरपीच्या यादीत पुन्हा एकदा मारली बाजी
२०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आता दोन वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. सतत येणऱ्या रंजक ट्विस्टमुळे नेहमीच ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये राहिली आहे. या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर म्हणजेच अप्पू आणि अभिनेता चेतन वडनेर म्हणजेच शशांक यांची केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या चंगलीच पसंतीस उतरली. मालिकेतील इतर कलाकार म्हणजेच अभिनेते शरद पोंक्षे, उदय टिकेकर, मंगेश कदम, अतुल तोडणकर, सुप्रिया पाठारे, लीना भागवत, सारिका निलाटकर-नवाथे, नम्रता प्रधान अशा अनेक तगड्या कलाकार मंडळींनी मालिकेतील पात्र उत्तमरित्या साकारली.
या मालिकेचा शनिवारी १८ नोव्हेंबरला म्हणजे उद्याच शेवटचा भाग प्रसारित होऊन ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तसेच अप्पू व शशांक यांच्या बाळाच्या नामकरण सोहळ्याने मालिकेचा गोड शेवट होणार आहे. या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी चाहत्यांसोबत गेल्या दोन वर्षातील काही सुखावणारे भाऊक अनुभव शेअर केले आहेत. तसेच या मालिकेतील शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी अनेक पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटली.
यानिमित्त नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून या मालिकेचे चाहते भावूक होत आहेत. त्यामध्ये प्रत्येकजण मालिकेमधील दोन वर्षांहून अधिक काळाचा प्रवास कसा होता? याविषयी आपले अनुभव व्यक्त करताना दिसून येत आहे. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने चाहत्यांना आता सर्व पात्रांची नक्कीच आठवण येईल.
हे देखील वाचा: लवकरच वाजणार ‘प्रसाद आणि अमृता’च्या लग्नाचे सनई-चौघडे