कच्चा बदाम’ या गाण्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अंजली अरोरा इंस्टाग्रामवर एकाहून एक रील्स बनवून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. कच्चा बदाम वरील भन्नाट नृत्याचा एक व्हिडिओ अंजली अरोराने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून शेअर केला होता. या रीलला चांगलीच पसंती मिळाली होती. तिच्या चाहत्यांमुळे अंजली ‘अरोराला लॉक अप सीझन वन’ मध्ये काम मिळाले. ती नेहमीच तिच्या डान्स मूव्ह्सने लोकांना वेड लावते. अभिनेत्री कंगना रनौतने तिला तिच्या नृत्यकौशल्याबद्दल टोमणा मारला होता. लोक तुला फॉलो का करतात? असा प्रश्न कंगनाने अंजलीला विचारला होता. तरीही तिने लोकांचे मनोरंजन करण्याचे काम थांबवले नाही. तिची लोकप्रियता एवढी वाढली की टेलिव्हिजनवरील ‘लॉक अप’ या शोमध्ये तिला स्पर्धक म्हणून घेण्यात आलं.
आता अंजली अरोरा एका नवीन शो म्हणजेच खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे. नुकतंच तिने याबद्दल खुलासा केला आहे. अंजली अरोरा प्राणी, पक्षी आणि करंट अशा विविध प्रकारच्या धोक्यांचा सामना करताना पाहायला मिळणार आहे. अंजलीचे चाहते ही बातमी ऐकून चांगलेच उत्सुक आहेत. कारण आता रील्सशिवाय अंजली वेगवेगळे स्टंट करताना दिसणार आहे.
अंजली म्हणाली “मला पाली आणि सरड्यांची भीती वाटते, ज्यावर मी मात करायचा प्रयत्न करत आहे.” याशिवाय तिला या खेळामध्ये सापांचा व झुरळांचा ही सामना करावा लागणार आहे. ती आता ‘खतरों के खिलाडी सीझन १३’ साठी पूर्णपणे तयार आहे.
लॉकअप सीझन 1 ला जाण्यापूर्वी अंजली अरोराचे 11 लाख फॉलोअर्स होते, आता ते 12.5 लाख झाले आहेत. अशातचं चाहत्यांना अंजलीचे नवे रूप पाहायला मिळणार आहे.