बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेता, आणि आपल्या विविध वेगळ्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आमिर खान.
आमिर खानने सध्या चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. तो सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कुटुंबासोबत वेळ घालवत असताना आमिरने सांगितले की, “माझ्या कुटुंबाबरोबरचे माझे नाते दिवसेंदिवस सुधारत आहे आणि मी त्याचा आनंद घेत आहे. मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवून आनंदी आहे,”
तसेच त्याने त्याच्या मुलीच्या म्हणजेच आयरा खानच्या लग्नाची तरिखही सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. आयरा व नुपूर शिखरे यांनी १८ नोव्हेंबर २०२२ ला साखरपुडा केला होता. आत्ता लवकरच ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचं आमिरने सांगितलं आहे.
दोघांचं लग्न नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये होणार असून आयरा व नुपूर ३ जानेवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मुलीच्या पाठवणीबद्दल बोलताना वडील म्हणून आमिर खान झाला होता.
“आयरा ३ जानेवारीला लग्न करणार आहे. मुलगा तिने निवडलेला आहे. खरं तर त्याचं निकनेम पोपोये आहे, तो ट्रेनर आहे. त्याचे नाव नुपूर आहे. तो खूप छान मुलगा आहे. जेव्हा आयरा नैराश्याशी लढत होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता. तो खरोखरच तिच्या पाठीशी उभा राहिला आणि तिला भावनिक आधार दिला. मला आनंद आहे की, तिने एक असा मुलगा निवडला, ज्याच्याबरोबर ती खूप आनंदी आहे. ते खूप कनेक्टेड आहेत. ते एकमेकांची खूप काळजी घेतात,” असं आमिर म्हणाला.
“हा फिल्मी डायलॉग वाटू शकतो, पण नुपूर मला माझ्या मुलासारखा वाटतो. तो खूप चांगला मुलगा आहे, आम्हाला वाटतं की तो कुटुंबाचा एक भाग आहे. त्याची आई प्रीतमजी आधीच आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत,” असं आमिरने नमूद केलं. मुलीच्या लग्नात भावुक होणार का? असं विचारल्यावर आमिर म्हणाला, “मी तर खूप भावुक होतो. लग्नाच्या दिवशी मी खूप रडणार आहे. त्यादिवशी आमिरची काळजी घ्या, अशी चर्चा घरात सुरू झाली आहे, कारण मी माझं हसणं किंवा रडणं नियंत्रित करू शकत नाही.”