भारतीय चित्रपटसृष्टीचा उगवता सूर्य म्हणजेच धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके. यांचा जन्म ३० एप्रिल १८७० मध्ये झाला. म्हणजेच आज आपण दादासाहेबांची १५३वी जयंती साजरी करत आहोत.
दादासाहेब फाळके यांना फोटोग्राफीची प्रचंड आवड होती. अपार कष्टानंतर ३ मे १९१३ रोजी दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिशचंद्र’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मूकपट तयार केला. तेव्हापासून भारतात चित्रपटनिर्मितीला सुरुवात झाली.
परंतू जेव्हा त्यांनी राजा हरिशचंद्र या सिनेमाच्या निर्मितीला सुरूवात केली तेव्हा मात्र त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातील एक अडचण म्हणजे त्यांना त्यांच्या या पहिल्या सिनेमासाठी अभिनेत्री मिळणे फार अवघड झाले होते. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली कोणीही त्यांच्या सिनेमात अभिनेत्री म्हणून काम करायला तयार होत नव्हते.
View this post on Instagram
यामागील कारण म्हणजे, त्यांच्या पहिल्या सिनेमाचं बजेट हे केवळ १५,००० रूपये होते. आणि दादासाहेबांना तेवढ्याच रकमेत संपूर्ण सिनेमाचा खर्च करायचा होता. त्यामुळे कमी मोबदल्यात कोणीही अभिनेत्री म्हणून काम करायला तयार होत नसे. तरीही दादासाहेबांनी हार मानली नाही ते अनेक जागी फिरले. अक्षरशः त्यांनी रेड लाईट एरियात देखील जाऊन त्यांच्या सिनेमासाठी अभिनेत्रीचा शोध घेतला.
एवढे करूनही सिनेमासाठी त्यांना अभिनेत्री मिळाली नाही. शेवटी ते निराश एका हॉटेलमध्ये जाऊन बसले असता यांची नजरेत एक मुलगी आली आणि तीच या सिनेमाची अभिनेत्री म्हणून झळकली.
दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे ९५ चित्रपट तर जवळपास २५ लघुपट बनवले. यामुळे दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते.