Nitin Chandrakant Desai Suicide: सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्गज कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर आली असून एनडी स्टुडीओमधील काही कर्मचाऱ्यांना ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले असता त्यांनी लगेच पोलिसात कळवले. त्यांच्या आत्महत्येचे करण मात्र अजुन समोर आलेलं नाही.
नितीन देसाई हे सिनेसृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे. २००५ साली त्यांनी हिंदीला ही टक्कर देणारे व मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असे स्वतःचे एनडी स्टुडीओ सुरु केले. सिनेसृष्टीत प्रवेश करण्याआधी त्यांनी मुंबईतल्या सर जे.जे.कला महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतले. १९८७ पासून त्यांनी कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली. १९९३ साली त्यांनी ‘भूकंप’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ त्यांचा हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला असून या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली.
त्यानंतर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं होत. त्यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपटाचा मान पटकावला असून तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘जोधा अकबर’, प्रेम रतन धन पायो’, ‘लगान’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे आहेत.
तसेच त्यांनी स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेली ‘राजा छत्रपती’ मालिकेची निर्मिती केली.
नितीन देसाई यांच्या आत्महत्ये नंतर संपूर्ण सिनेसृष्टीत हाहाकार पसरला आहे.