अभिनेत्री ‘नीतू कपूर’ या ७०च्या दशकातील अत्यंत सुंदर व हुरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात. वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होतीच पण कपूर घराण्याची सून व ऋषी कपूर यांची पत्नी ही लग्नानंतर त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.
आज नीतू यांचा ६५वा वाढदिवस आहे. वयाच्या ६५व्या वर्षी देखील त्या अजूनही तितक्याच फिट आहेत. नीतू व ऋषी यांची पहिली भेट ही १९७४ मध्ये ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली तेव्हा नीतू ह्या अवघ्या १५ वर्षाच्या होत्या. सेटवरच दोघांची छान मैत्री देखील झाली. त्यावेळेस ऋषी यांची गर्लफ्रेंड होती त्या दोघांमध्ये भांडण झालं की ते नीतू यांच्याकडून लेटर लिहून घ्यायचे. नीतू यांनी देखील खूप वेळा ऋषी कपूर यांना लेटर लिहून दिले याच दरम्यान त्यांची मैत्री वाढत गेली.
अशा प्रकारे, ते दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. काही दिवसांनी ऋषी यांचे त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप झाले. त्यांनतर त्यांची नीतू सोबतची जवळीक अजून वाढत गेली ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि डेट करू लागले. १५ वर्षाच्या नीतू यांना २१ वर्षाच्या ऋषी यांच्यावर प्रेम झाले होते.पण त्यांचं प्रेम ऋषी यांच्या वडिलांना म्हणजेच राज कपूर यांना मान्य नव्हते.
त्यावेळेस ऋषी कपूर यांनी सांगितले की मी नीतूवर प्रेम करतो व मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. असा हट्ट त्यांनी त्यांच्या वडीलांकडे धरला होता. मुलाच्या हट्टापायी राज कपूर यांनी त्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. तसेच नीतू यांची आई देखील या लग्नामुळे खुश नव्हती पण लग्नानंतर जसजसे दिवस सरू लागले तसेच राज कपूर व नीतू यांच्या आईने त्या दोघांचा स्वीकार केला.
त्या दोघांच्या लग्नातील एक मजेशीर किस्सा म्हणजे नीतू यांनी लग्नासाठी फार जड लेहेंगा खरेदी केला होता. तो सांभाळण्यामध्येच त्यांची दमछाक झाली. शेवटी लेहेंंगा सांभाळता-सांभाळता त्या बेशुद्ध पडल्या. तसेच ऋषी हे कपूर घरण्यातील लाडके चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या लग्नाला प्रचंड गर्दी झाली होती. आजू बाजूला एवढी माणसांची गर्दी बघून त्यांना भोवळ आली.