मालिका असो वा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीसाठी मेकर्स आणि कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळतं ते प्रेक्षकांच्या प्रेमातून, त्यांचं हे प्रेम दर ८-१० दिवसांत समोर येणाऱ्या टीआरपी लिस्टमधून दिसून येते.
वेगवेगळ्या कथांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका आणि रिअॅलिटी शो मराठी वाहिन्यांवर पार पडत असतात. प्रत्येकजण स्वतःच्या आवडीनुसार मालिका टीव्ही, आॅनलाइन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतात. प्रेक्षकांच्या आवडीनुसार मालिकांच्या टीआरपीचा क्रमांक कायम कमी जास्त होत असतो.
यावेळी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिला क्रमांक गाठला आहे. एवढेच नाही तर स्टार प्रवाहवरील मागच्या महिन्याची सरासरी काढता ठरलं तर मग या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांक पटकावला होता. तर आजही त्यांचं हे स्थान भक्कम टिकवून ठेवत या मालिकेने सर्वाधिक प्रेक्षकांची पसंतीसह, ७.४ टीआरपी मिळवत सर्व मालिकांच्या टीआरपी लिस्टमध्ये पहिला क्रमांक गाठला आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. काही वर्षांपूर्वी गाजलेली ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील कल्याणी म्हण्जेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री ‘जुई गडकरी’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारताना दिसली. त्यामुळे प्रेक्षकांचा या मालिकेकडे चांगलाच कल होता. जुईने तिच्या इंस्टाग्रामवरून नुकतीच एक खास पोस्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली, यात ती ठरलं तर मग मालीकेच्या सेटवर असून तिथे सध्या त्यांच्या या यशाचे जोरदार सेलिब्रेशन सुरु असल्याचे दिसले.
यावेळी मालिकेच्या सर्व टीमने मिळून केक कापला, तसेच प्रत्येकाने नाचत हा आनंद साजरा केला. यावेळचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत जुईने लिहिले की, “एकत्र सेलिब्रेशन केल्यानंतर टीम एकत्र राहते! आज आमच्या मालिकेला ७.४ टीआरपी मिळाला आहे! हो, हा आकडा गाठण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे! देना वाला जब भी देता, देता छपर फाडके! टीमचे अभिनंदन”
View this post on Instagram
या मालिकेत जुईसोबत अभिनेता अमित भानुशाली हा देखील मुख्य भूमिकेत आहेत. जुई ही ‘सायली अर्जुन सुभेदार’ तर अमित ‘अर्जुन प्रताप सुभेदार’ हे पात्र साकारत आहेत. तसेच चैतन्य सरदेशपांडे, ज्योती चांदेकर, प्रियंका तेंडूलकर, मोनिका दबडे आणि मीरा जगन्नाथ हे कलाकार या मालिकेची रंजकता आणखीनच वाढवत आहेत.