‘बिनकामाचा नवरा’ हा चित्रपट डोळ्यासमोर आला की सगळ्यांत आधी नाव समोर येत ते म्हणजे रंजना देशमुख. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या चित्रपटामधून आजही सगळ्यांच्या आठवणीत आहेत. रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच अस एक अढळ स्थान निर्माण केल आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक दिग्गज कलाकारांना मागे सोडले होते.
त्यांनी आता पर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यापैकी बिनकामाचा नवरा, मुंबईचा फौजदार, असला नवरा नको ग बाई, सासू वरचढ जावई, सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी, तर अरे संसार संसार, गुपचूप या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राज्यसरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
परंतु ३ मार्च २००० साली त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांची जागा मात्र कायमची रिकामी झाली. आज त्याच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करण्याचे कारण म्हणजे आज त्यांचा २३ व स्मृतिदिन…. आज त्यांचा थोडक्यात जीवनपट पाहूया.
सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या त्या कन्या, तर प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या त्यांच्या मावशी. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू हे त्यांना घरातूनच मिळाले होते. त्यांची खूप कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
रंजना यांनी १९६५ मध्ये व्ही. शांताराम निर्मित दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘झुंज’ या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिकेचे काम केले आणि तेव्हा पासून त्या पुढे अनेक चित्रपटात दिसल्या. केवळ सिनेमाच नाही तर नाटकसृष्टीत ही त्यांनी नाव कमावले. त्यांची बरोबरी करेल अशी एकही अभिनेत्री त्याकाळी नव्हती पण एका अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.
रंजना या झुंजार या चित्रपटाच्या शुटींग साठी बंगलोरला निघाल्या होत्या, जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला व त्या अपघातात त्यांचे दोनी पाय निकामी झाले. त्याच बरोबर त्यांचा डावा हात देखील निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ ३२ वर्षाचा होत्या. त्या अपघाता नंतर त्यांनी आयुष्याची पुढची १३ वर्ष व्हीलचेअर वर काढली.
असं म्हणतात की अशोक सराफ आणि रंजना यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले होते. ते दोघे एकमेकंशी लग्न करणार होते असे देखील म्हंटले जात होते. परंतु रंजना यांचा अपघात झाला आणि तिथेच त्यांचे प्रेम देखील संपले. त्यांनी शेवटचे काम केले ते ‘फक्त एकदाच’ या नाटकात. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे त्या नाटकाचे कथानक होते. हे नाटक हे रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होते असे म्हंटले जाते. पुढे रंजना आणखीनच खचत गेल्या, अखेर वयाच्या ४५ व्या वर्षी परेल इतल्या राहत्या घरी हृदय विकाराने त्यांचे निधन झाले.