मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते, गायक आणि अभिनेते सचिन पिळगावकर(Sachin Pilgaonkar) यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने घरोघरी पाहिला जातो. २००५ साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने तब्बल दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल. आजही या चित्रपटाचे सगळे डायलॉग प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. तसेच यातील गाणी देखील सगळ्यांच्या तोंडपाठ आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाखुळ घातला होता.
या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिवर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर असे एकाहून एक मात्तबर कलाकार होते. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. आता याच एव्हरग्रीन चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तब्बल १९ वर्षानंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या सोशल मिडियावरून या चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 5 फेब्रुवारीपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे. आता या चित्रपटाची कथा काय असणार, आणि यावेळी वॅकी नवस फेडायला कुठे जाणार आणि तो नवस पूर्ण होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
तसेच यावेळी अनेक कलाकार आपल्याला या भागात दिसणार नाहीत. पहिल्या भागातील रीमा लागू, सतीश तारे, प्रदीप पटवर्धन, आनंद अभ्यंकर हे कलाकार आता आपल्यात नाहीत. पण प्रेक्षकांना मात्र त्यांनी उणीव जाणवत आहे.
View this post on Instagram
प्रेक्षकांनी या पोस्टवर अनेक कमेंट केल्या आहेत. सगळ्यात जास्त रीमा लागू यांची आठवण येईल असं त्याचं म्हणणं आहे. ‘यावेळी आम्ही सगळ्यांनाच मिस करू’ अशी एकाने कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने ‘आधीचेच कलाकार भारी होते’ अशी कमेंट केली. तर अनेकांनी ‘रीला लागू असल्या पाहिजे होत्या’ अशी कमेंट केली आहे. ‘त्या असत्या तर आणखीन मज्जा आली असती’ असं एकाने म्हंटल आहे.
तर दुसऱ्या भागात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. तर या भागात किती मज्जा येणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. तसेच प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याकडे मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह चित्रपटाच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.