रेनड्रॉप मिडियाच्या संस्थापक रोहिणी अय्यर यांचे सिनेसृष्टीत चांगलेचं नाव गाजले आहे. उद्योजक जगतात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच न्यूयॉर्क शहरातील फायरसाइड चॅटमध्ये महिला व्यावसायिकांच्या सक्षमीकरणासाठी खास चर्चा आयोजित करण्यात आली होती. याच दरम्यान रोहिणी अय्यर यांनी बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टी बद्द्ल आपले मत मांडले.
या कार्यक्रमात संवाद साधताना रोहिणी अय्यर म्हणाल्या की “स्त्रिया या कायम उत्तम काम करतात. आपण एखादा की दृढनिश्चय केला की सगळेच अडथळे पार करून जे हवं ते मिळवू शकतो.”
सिनेसृष्टीबद्दल त्या पुढे म्हणाल्या की, “माझ्या इंडस्ट्रीमध्ये जी भारतीय फिल्म इंडस्ट्री आहे, मी त्याला बॉलिवूड देखील म्हणत नाही. कारण अशा सुंदर उद्योगाला स्टिरिओटाईप केल्यासारखे वाटते. आम्हाला हॉलिवूडशी तुलना करण्याची काय गरज आहे? आमची इंडस्ट्री ही उत्तम आहे आणि खूप कमालीचं काम इथली लोकं आणि कलाकार कायम करतात”
रोहिणी अय्यर यांनी भारतीय मनोरंजन सृष्टीच्या महत्त्वकांक्षेवर भर देत जगात भारतीय सिनेसृष्टीचे महत्त्व किती आहे हे जगासमोर मांडले.