मराठी सिनेसृष्टीत नाट्यकलेचा मोलाचा वाटा आहे. उत्तम कलेने नाट्यक्षेत्र सुरुवातीपासूनच बहरत आले आहे. कलाकारांची मेहनत आणि त्यांना मिळालेली प्रेक्षकांची साथ यामुळे नाटकांना आज सिनेसृष्टीत मानाचं स्थान आहे.
मागील काही वर्षात नाट्यगृहांचा दर्जा ढासळला आहे. नाट्यगृहातील डागडुजी , स्वच्छता यांसारख्या अनेक समस्यांनाबाबत सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. परंतू आजवर त्या समस्यांचा पाठपुरावा झाला नव्हता. त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षकवर्ग नाट्य संस्कृतीपासून लांब तर जाणार नाही ना या चिंतेत वाढ झाली होती. परंतू आता महाराष्ट्र सरकारने नाट्यकलेला हातभार लावला आहे. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत आनंद व्यक्त केला जात आहे.
नुकतेच महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये सांस्कृतिक विभागासाठी १०८५ कोटींची तरतूद करण्यात आली. सरकारच्या या निर्णयाने कलाकार मंडळी आणि संपूर्ण प्रेक्षकवर्ग सुखावला आहे. यानिमित्त नाटक, मालिका आणि चित्रपटातून आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता ‘संदीप पाठक’ने एक खास पोस्ट केली आहे.
नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी राज्यसरकारने ५० कोटींची तरतूद केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्हा सर्व कलाकारांची मागणी होती की नाट्यगृहांची चांगली देखभाल झाली पाहिजे, कारण प्रेक्षक ४०० रूपये खर्च करतो. आमच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल सरकारचे आभार 👏 #नाट्यगृह… https://t.co/P7oGWxhtFN pic.twitter.com/1JIPFMFheO
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) March 10, 2023
ट्विटरवर एका नाट्यगृहाचा फोटो शेअर करत संदीप पाठकने लिहिले की, “नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी राज्य सरकारने ५० कोटींची तरतूद केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्हा सर्व कलाकारांची मागणी होती की नाट्यगृहांची चांगली देखभाल झाली पाहिजे, कारण प्रेक्षक ४०० रूपये खर्च करतो. आमच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल सरकारचे आभार.”
संदीप पाठकने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करीत आभार मानले आहे. तर सरकारच्या या प्रयत्नाने नक्कीच प्रेक्षकवर्ग आणखी बहरत जाणार आणि कलाकारांना देखील आणखी जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा मिळणार.