मागील काही दिवसांत अनेक लग्न पार पडली. पण सध्या मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तापसी पन्नू (Taapsee Pannu) आहे.
मागील काही दिवसांत तापसीने लग्न केले अशा चर्चा सुरु होत्या. पण ही अफवा आहे की सत्य हे समजायला काही मार्गचं नव्हता. पण तापसीच्या बॉयफ्रेंडबद्दल अनेकांना माहित होते. तापसी अनेकदा सोशल मीडियावर दोघांचे एकत्रित फोटो पोस्ट करायची. तापसीने बॉयफ्रेंड ‘माथियास बो’सोबत मागील एक दोन नव्हे तर तब्बल १० वर्षे डेट केल्यानंतर मार्चमध्ये लग्नगाठ बांधली.
लग्नात शाही थाटमाट न करता तापसीने गुपचूप लग्न उरकलं हे आपल्या सर्वांना माहितच आहे. परंतू यावर अजूनही तापसीने शिक्कामोर्तब केला नाही. गुप्तता पाळत, लग्नाचा गाजावाजा न करता तापसीने लग्नगाठ बांधली असली तरी आता लग्नाच्या काहीच दिवसांत तापसी आणि माथियास बोच्या लग्नाचा एक व्हिडीओ मीडियासमोर आलाच. तापसी आणि माथियास बो हे उदयपुरमध्ये लग्नबंधनात अडकले. यावेळी लग्नाची गजबज न करता कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत लग्न केले. लग्न जरी कमी लोकांमध्ये केले असले तरी तिने लग्नाचे सर्व कार्यक्रम रीतीरिवाजाप्रमाणे केले आहेत.
गेल्या महिन्यात २० ते २३ मार्च दरम्यान तापसी आणि माथियास बो यांचा लग्नसोहळा सुरु होता. तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि माथियास बो यांची पहिली भेट ही २०१३ मधील इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटनावेळी झाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे अनेक फोटो शेअर देखील केले. तर आता नुकतीच रंगपंचमी झाली, या दोघांनी एकत्र लग्नानंतरचा पहिला सण साजरा केला. तर आता लग्नानंतर तिच्या कामाचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला. तर त्याबाबत आता स्वतः तापसीने भाष्य केले आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, “आता कामाशिवाय मी माझ आयुष्य आनंदात जगतेय. आताच्या घडीला माझी प्रोफेशनल चॉईस हा माझ्या वेळेवर अवलंबून आहे. मी कोणाताही प्रोजेक्ट साईन करताना त्याच्या माझ्या वेळेवर तर परिणाम होणार नाही ना याची मी जास्त काळजी घेते. कारण आता कामाशिवायही मला माझ आयुष्य एन्जॉय करायचं आहे.”
तसेच पुढे ती म्हणाली की, “मला कामाच्या पलीकडे जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. वेळेच्या कसोटीवर टिकणार नाही अशा गोष्टीसाठी मला वेळ द्यायचा नाही. स्वत:शिवाय इतर कोणाशीही स्पर्धा न करण्यातच मी आनंदी आहे. सध्या व्यवसायाच्या पलीकडे आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. तुमच्या आजूबाजूला नेहमीच असे लोक असतील ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त किंवा कमी असेल. सगळ्यात पुढे पोहचण्याच्या शर्यतीत आपण हे विसरतो की, ‘टॉप’ असं काही नाही आहे. मला एक गोष्ट कळाली आहे, ती म्हणजे जीवनाचा आनंद घेणे.”