‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधती हे पात्र जेवढे गाजले तेवढीच लोकप्रियता अनिरुद्ध या पात्रालाही मिळाली. अनिरुद्ध हे पात्र अभिनेते मिलिंद गवळी यांनी साकारले आहे. या मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका असल्यामुळे ते नेहमीच काही ना काही गोंधळ घालताना दिसतात.
असे असले तरी प्रेक्षकांना त्यांच्या भूमिकेचा राग येत असला तरी मिलिंद यांचा पन्नाशी नंतरचा अभिनय आणि कामातील कणखरपणा पाहून प्रेक्षक कायमचं त्यांचे कौतुक करीत असतात. मागील काही वर्षांपूर्वी मिलिंद यांनी मराठी, हिंदी मालिकांमध्ये तर मराठी सिनेमांमध्ये उत्कृष्ट काम करत त्यांनी त्यांचा काळ गाजवला. पण आजही ते तरुणांच्या जोडीने तेवढेच कार्यरत आहेत. ते सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतात.
मिलिंद अनेकदा सोशल मीडियावर वाचनीय पोस्ट शेअर करत असतात. त्यांचे वेगवेगळया विषयांवरील मत ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या अशा पोस्टमुळे ते कायम चर्चेत येत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांची ही पोस्ट म्हातारपणात नक्की कसं एन्जॉय करावे यावर खूपच सुंदर पोस्ट लिहिली आहे.
हे देखील वाचा : सिनेसृष्टी गाजवायला ‘टीडीएम’ या दिवशी होणार प्रदर्शित…
मिलिंद गवळी यांनी लिहिले की,
“Growing old Gracefully
मराठी अनुवाद – आकर्शकपणे वयस्कर होणे,
Time is ticking all the time for all of us.
And we are getting old every second ,every moment,
वेळ कोणासाठी थांबत नाही,
आणि असं म्हणतात ही वेळेतच सगळं व्हायला हवं, एकदा का वेळ निघून गेली की मग तुम्हाला काहीही करता येत नाही, आणि दुर्दैव असा आहे की खूप कमी लोकांना वेळेचे महत्त्व आहे, बऱ्याचशा लोकांना स्वतःच्या तर नाहीच पण दुसऱ्याच्या ही वेळेची अजिबात किंमत नसते. खरंतर वेळ पाळणे punctuality हा एक वेगळाच गहन विषय आहे. यावर तर मला खूपच बोलायचं आहे, पण सविस्तरपणे नंतर..पण आज, ग्रेसफुली जगणं म्हणजे काय? याविषयी थोडं बोलावसं वाटतं, खूप लोकांना असं वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे, पण खरंतर खूप वेळ हा कोणाकडेच नसतो, प्रत्येकाची वेळ ठरलेली असते.”
View this post on Instagram
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “एक कलाकार म्हणून मी ज्यावेळेला माझ्या क्षेत्रातल्या काही लोकांकडे बघतो, आणि मला त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं त्यांच्याकडे बघून छान वाटतं, आपण पण त्यांच्यासारखं व्हायला हवं किंवा त्यांचे काही गुण आपण घ्यायला हवेत असं सतत वाटत असतं, केरलाचे मोहनलाल यांच्याबरोबर मी काम केलं आहे मला हा कलाकार फार ग्रेसफुली जगतो आहे असं वाटतं, तसंच मी प्राण साहेबांबरोबर काम केलं होतं, ज्या वेळेला त्यांच्याबरोबर सिनेमा केला त्यावेळेला त्यांचं वय होतं ८५, या वयात सुद्धा ते फार ग्रेस फुल होते, मी निळू भाऊ बरोबर ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला सुद्धा त्यांचं वय होतं ७७-७८ खूप ग्रेसफुल होते ते, पंडित जसराज यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध होते , वयाच्या ९० मध्ये सुद्धा ते इतकं सुरेख गायचे, स्वर्गातून परमेश्वर येऊन त्यांचं गायन ऐकत बसत असतील असं वाटायचं, माझे वडील श्री श्रीराम गवळी वयाच्या ८४ वर्षात जितक्या उत्साहाने काम करतात , मला इन्स्पिरेशन दुसरीकडे कुठेही बघायची गरजच नाही.”