बॉलिवूड कलाकारांची प्रेमकहाणी कधीच जगापासून लपून राहत नाही. कलाकार जरी खुलेपणाने याबद्दल बोलत नसले, त्याचं रिलेशनशिप जगासमोर जाहीरपणे कबूल करत नसले तरीही ते सगळ्यांना समजतच. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कधीच आपले रिलेशन जगासमोर कबूल केले नाही, त्यांनी नेहमीच त्या गोष्टी खाजगी ठेवल्या आहेत. पण चाहत्यांना त्या गोष्टी लगेच समजतात. अनेकदा कलाकार त्यांना विचारल्यावर नकार देतात. पण बॉलिवूडमध्ये असे देखील कलाकार आहेत, ज्यांनी आपण नात कधीच जगापासून लपवलं नाही. असच बॉलिवूडमधील एक कपल म्हणजे तमन्ना भाटीया आणि विजय वर्मा.
तमन्ना आणि विजय गेले अनेक दिवस एकमेकांना डेट करत आहेत. मागील वर्षी ‘लस्ट स्टोरी’चा दुसरा सिझन आला. यामध्ये बॉलिवूड मधील काजोल देवगन, तमन्ना भाटीया, मृणाल ठाकूर, विजय वर्मा यांसारखे अनेक दिग्गज कलाकार होते. हा सिझन चांगलाच गाजला. यामध्ये विजय आणि तमन्ना या दोघांनी इंटीमेट सीन देखील केले आहेत. आणि इथुनच सुरु झाली ती तमन्ना आणि विजय यांची लव्हस्टोरी. तमन्ना आणि विजय यांची पहिल्यांदाच ‘लस्ट स्टोरी २’ च्या दरम्यान भेट झाली होती. या दोघांनी पहिल्यांदाच यानिमित्ताने एकत्र काम केले होते. आधी दोघांमध्ये मैत्री झाली, आणि नंतर मैत्रीच रुपांतर प्रेमात झाले. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसून येतात. तसेच अनेकदा दोघेही एकत्र पार्ट्यांना आणि अवाॅर्ड फंक्शनला दिसून येतात.
नुकतच एका पोडकास्ट दरम्यान विजयने या दोघांची प्रेमकहाणी शेअर केली. यावेळी त्याने ते दोघे कसे भेटले, कशी त्यांची ओळख झाली, कसे प्रेमात पडले हे सगळ काही सांगितल. यावेळी विजय म्हणाला, “लस्ट स्टोरीच्या शुटींगच्या दरम्यान आम्ही दोघ एकमेकांना डेट करत नव्हतो. शुटींग संपल्यानंतर आम्ही एक रॅप अप पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला आम्ही फक्त चारच जण होतो. त्यावेळी मी तिला विचारल होत की मला तुझ्यासोबत हँग आउट करायचं आहे. त्यांनतर २० – २५ दिवसांनी आमची पहिली डेट झाली होती.”
याआधी एकदा तमन्नाने या दोघांच्या नात्याबद्दल भाष्य केले होते. त्यावेळी ती म्हणाली होती की, “विजय आणि माझ्यातील बॉन्डिंग अगदी नैसर्गिक आहे. तो एक असा व्यक्ती आहे ज्याची मला खूप काळजी असते, तो माझा हॅपी प्लेस आहे.”
लस्ट स्टोरी २ मधील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर कधी दिसणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.