सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांच काही दिवसांपूर्वीच दु:खद निधन झाल. ते चित्रपटसृष्टीतील अत्यंत देखणे अभिनेते म्हणून ओळखले जातात.
त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं असून त्यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. रवींद्र यांच अगदी छोट कुटुंब असून त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी असे सदस्य आहेत.
त्यांचा मुलगा गश्मीर हा देखील प्रसिद्ध अभिनेता असून तो त्याच्या आईसोबत मुंबईला राहतो. मात्र रवींद्र महाजनी हे त्यांच्या कुटुंबा पासून गेले आठ महीने वेगळे राहत होते. ते पुण्यामधील एका आंबी गावात राहत होते.
त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले असता १५ जून रोजी त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांचा मृतदेह दाभाडे रुग्णालयात ठेवण्यात आला पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वीच झाला होता.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा गश्मीर याला ट्रोल करण्यात आलं त्यावर गश्मीरने आत्ता चांगलच सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुण एक पोस्ट शेअर केली आहे.
त्या पोस्टमध्ये गश्मीरने असं म्हंटलंय की, “अभिनेता हा कायमच अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केलं. आम्ही शांत राहिल्याने अनेक जण द्वेष करत आहेत, शिव्याही देत आहे आणि आम्ही त्याचंही स्वागतच करतो.
आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्कीच बोलेनच.”