टेलिव्हिजनवरील मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ मागील काही वर्षांपासून सुरू असलेला हा शो आज प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यातील एक भाग झाला आहे. द कपिल शर्मा शो आत्तापर्यंत चार भागांत प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी वेगवेगळी थिम घेऊन आला आहे.
कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमला या शोमुळे प्रचंड प्रमाणात प्रसिध्दी मिळाली. या शोमध्ये केवळ बॉलिवूड कलाकारच नाही तर दाक्षिणात्य कलाकार देखील अनेकदा उपस्थित राहत असतात. या शोमुळे कलाकारांच्या खऱ्या व्यवहारिक आणि खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा होत असतो.
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा शो आता बंद होणार आहे. जून महिन्याच्या अखेरीस हा शो निरोप घेणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. परंतू हा शो संपुष्टात येणार नाही. द कपिल शर्मा शो वर्षाच्या मधल्या काळात हंगामी ब्रेक घेत असतो. त्याचप्रकारे आताही शो सुट्टीवर जाणार आहे.
रिपोर्टनुसार सांगण्यात आले आहे की, “कपिल शर्माला आता विश्रांती घ्यायची आहे. त्यामुळेच हा शो तात्पुरता बंद करण्याचा विचार सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, शोच्या टीआरपीच्या दृष्टीने प्रत्येक वेळी सीझन ब्रेक ही योग्य गोष्ट आहे. याद्वारे निर्माते शोमधील सामग्री आणि कलाकारांमध्ये फेरफार करण्यास सक्षम आहेत. तसेच, कलाकारांना देखील ब्रेक आवश्यक आहे जेणेकरून ते ताजेतवाने होऊ शकतो. विश्रांतीनंतर, शोमध्ये परत या. तसेच, शो सतत चालवल्यामुळे कंटाळवाणे आणि नीरस होण्याची शक्यता देखील वाढते. म्हणूनच ब्रेक घेणे हा एक चांगला प्रयोग आहे.”
मे महिन्याच्या अखेरीस शोचे शूटींग पूर्ण होऊन जूनमध्ये या शोचा आणि या सिझनचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आतापासूनच प्रेक्षक पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.