‘माझा होशील ना’ या मालिकेतील आदित्य व सई म्हणजेच गौतमी व विराजसची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेतील त्यांची केमिस्ट्री सर्वांना फारच आवडली. पण आता ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.
‘माझा होशील ना’ मालिका गाजवल्यावर दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते लवकरचं त्यांच्या आगामी येणाऱ्या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चिन्मय मांडलेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गालिब’ या नाटकातून गौतमी व विराज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच प्रदीप मुळ्ये नाटकाचं नेपथ्य करणार असुन राहुल रानडे नाटकाच्या संगीताची धुरा सांभाळणार आहेत.
५ नोव्हेंबरला हे नाटक रंगभूमीवर येणार असून गौतमी – विराजस या नाटकमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तसेच त्यांच्यासोबत या नाटकात अश्विनी जोशी, गुरुराज अवधानी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. चिन्मय मांडलेकरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून पोस्ट शेअर करत या नाटकाची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. ‘हुई मुद्दत कि ‘गालिब’ मर गया, पर याद आता है, वो हर इक बात पर कहना, कि यूँ होता तो क्या होता !’ अंस कॅप्शन देत या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे.
हे नाटक कशावर आधारित असणार आहे याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण चाहते मात्र गौतमी व विराजसला पाहण्यास आतूर झालेले आहेत.
आणखी वाचा : मालिकेतील ‘वनिता खरात’चा जबरदस्त लूक पाहून चाहते झाले अवाक्! म्हणाले, फायर