मराठी सिनेसृष्टीत अभिनयासोबतच कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनात जिचा कोणीच हाथ धरु शकत नाही अशी अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळी.
प्राजक्ता कायमचं तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईल आणि इतर अनेक कारणांनी बरीच चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड ॲक्टिव असते.
प्राजक्ता सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगच्या निमित्ताने लंडनला गेली आहे. यादरम्यानचा थेंब्स नदीच्या काठावरील तिचे फोटोज् तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहे. अन् त्या पोस्टला तिने दिलेल्या कॅप्शनमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
प्राजक्ताने लंडनमधील संस्कृती आणि तेथील वातावरण याबाबत लिहले आहे. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिशांनी आपल्या देशावर १५० वर्षे राज्य केले. याबाबतीत तिने तिचा संताप व्यक्त केला. त्यामुळे तिच्या मनातील भारत देशाबद्दल असलेले प्रेम समजते.
प्राजक्ता असं म्हणतेय की, “ने मजसी ने परत मातृभूमीला…. सागरा प्राण तळमळला….भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं राहिल… आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो… एक क्षण देखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही… त्याला अनेक कारणं आहेत..
१- ह्याच ब्रिटीशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं?
२- कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच.
३- राणी गेल्यानं देश दुखवट्यात, ती मरगळ जाणवली.
४- इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, जखडून गेल्यासारखं झालं.
५- कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं.
६- संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत..
View this post on Instagram
तसेच ती पुढे म्हणाली की, “इथे रहात असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली… (आणि वैषम्य असं की आपणही मेंदू न वापरता मोठ्या प्रमाणात ती आंधळेपणानं स्वीकारली. तो अनादर ठळक झाला.) काही स्वच्छता आणि शिस्तीच्या चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत. पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्यांचं गणित लक्षात घेतलं तर हे जमवणं सहजी शक्य आहे, त्यात काही rocket science नाही. कामासाठी आले नसते तर ४ दिवसात परत धूम ठोकली असती. असो… मुद्दा असा की, इतर देश फिरल्यावर पदोपदी जाणवतं की सर्वच अंगांनी माझा प्रिय “भारत” किती महान देश आहे. आपण इतर देशांचे उगा गोडवे गातो… त्यामुळे यानिमित्तानं हे इथं लिहीणं महत्वाचं वाटलं… देवाचे किती आभार मानू की मी भारतात जन्माला आले. फक्त २ दिवस बाकी.. आलेच…” यावरून प्राजक्ताच्या मनातील देशाप्रतीची ओढ लक्षात येते.