‘द केरळ स्टोरी’ सिनेमा रिलीज होण्याच्या आधीपासूनच चर्चेत होता. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही, बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. कदाचित वादात अडकल्यामुळे हा सिनेमा चांगलाच गाजत आहे असं म्हणायला हरकत नाही.
या चित्रपटाचे केवळ ३० कोटी इतकेच बजेट होते. केवळ ३० कोटीमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला. पण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉलीवूडच्या बिग बजेट सिनेमांना देखील मागे टाकले आहे. आता चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आणि या कमाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या चित्रपटाचे शो लागत आहेत.
खूप कमी दिवसांत जास्त कमाई करणारा ‘पठाण’ नंतरचा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. तब्बल १८ दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या निमित्त अदा शर्माने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
अदाने शुटींग दरम्यानचे काही खास फोटो शेअर करत लिहिले आहे की, “ भारतीय प्रेक्षकांचे मनापासून आभार… गेल्या काही दिवसांत मी चित्रपटाला शुभेच्छा देणारे अनेक पोस्टर्स, होर्डिंग्ज पाहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खास चित्रपट पाहण्यासाठी बंगालहून आसामपर्यंत प्रवास करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ सुद्धा पाहिले. ‘द केरला स्टोरी’ आता प्रेक्षकांचा सिनेमा असल्याने त्या यशात मला सहभागी करुन घेण्यासाठी धन्यवाद…”
चित्रपटावर सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
हे देखील वाचा : भाईजानने का केला अब्दुचा पत्ता कट?