बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेते राज बब्बर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. बॉलिवूड मधील ते लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जातात. १९७७ मेध्ये ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं असून ‘इन्साफ का तराजू’ या चीत्रपटातून त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले त्यांनी त्यांच नाव बॉलीवूड मधेच नाही तर राजकारणातही त्याचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच आयुष्य हे कायम चर्चेत राहण्यासारख आहे. त्यांना एक यशस्वी राजकारणी म्हणून देखील ओळखले जाते.
राज बब्बर यांनी १९७७ मध्ये नादिरा झहीरशी लग्न केले. त्यांच वैवाहिक आयुष्य अगदी सुरळीत चालल होत. त्यांना जुही बब्बर व आर्य बब्बर अशी दोन मुले आहेत. सगळ काही सुरळीत चाललं असतात ‘भीगी पलकें’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट मराठमोळी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी झाली व त्यांना पाहताच क्षणी राज बब्बर हे त्यांच्या प्रेमात पडले. अभिनेत्रीच्या सौंदर्याने त्यांना वेड लावल होत. व त्याच क्षणी त्यांनी नादिरा बब्बर यांच्या सोबत घटस्फोट घेतला. कोणाचाही विचार न करता त्यांनी स्मिता यांच्याशी लग्न केलं. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी एका मुलाला जन्म दिल्यानंतर १५ दिवसातच जगाचा निरोप घेतला. लग्नाच्या काही काळातच स्मिता यांच निधन झाल्याने राज बब्बर पुन्हा एकटे पडले.
स्मिता यांच्या निधनानंतर राज बब्बर अगदी खचून गेले होते. व त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी कडे परत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचं दरम्यान त्यांच्या व रेखाच्या अफेर्स बद्दल बोलले जात होते. स्मिताच्या निधनानंतर रेखा सोबत त्यांची जवळीक वाढली होती. दोघेही दु:खात असल्यामुळे अधिक जवळ आले होते.
राज यांनी एका मुलाखतीमध्ये असे सांगितले की, “होय, आमच्या नात्याने स्मिताच्या निधनाच्या दुःखातून बाहेर पडायला मदत केली. काही परिस्थितीमुळे आम्ही एकत्र आलो होतो.”, त्यावेळी रेखा देखील एका नात्यातून बाहेर पडलेली होती. ‘ राज पुढे म्हणाले की, “आमचं एकमेकांवर खूप प्रेम नसलं तरी आम्ही ‘फक्त मित्र’ नक्कीच नव्हतो. मी जेवढा स्मिताच्या प्रेमात होतो तेवढा रेखासोबत नव्हतो. त्याची तीव्रता नव्हती. तसेच, आम्ही मित्र होतो असे मी म्हणू शकत नाही.”
रिपोर्ट्सनुसार, रेखाने जेव्हा राज बब्बरसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्याने साफ नकार दिला. यामुळे रेखा चांगलीच तुटली होती. त्याचवेळी त्यांनी राज यांच्याशी संबंध तोडले. मात्र, या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.
रिपोर्ट्सनुसार, रेखा आणि राजचे नाते फार काळ टिकले नाही. राजने रेखाशी संबंध तोडून पहिल्या पत्नीकडे परत जाण्याचा निर्णय घेतला होता. हे कळताच रेखाला मोठा धक्का बसला. जेव्हा राजने रेखाला तिच्यासोबत ब्रेकअप करणार आहे, असं सांगताच तिला धक्का बसला. तिचा विश्वास बसेना. यावरून दोघांमध्ये खूप भांडण झाल्याचं सांगण्यात येतं. राज निघून गेल्यावर रेखा अनवाणी त्याच्या मागे धावू लागली. हे सगळं रस्त्यावर घडलं. त्यावेळी सगळे लोक त्यांच्याकडे पाहत होते.