प्रेक्षकांना निशाच्या प्रेमात बुडालेल्या सत्यावर प्रेम करणारी निस्वार्थ श्रावणी खूपच आवडली. शेवटी सत्यानेही त्याच्या मनातील भावना श्रावणीला बोलून दाखवल्या पण त्यानंतर सत्या आणि श्रावणीच काय झालं असेल हा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण याचं उत्तर आता स्वतः रितेशने दिले आहे.
रितेशने इंस्टाग्रामवर शुभंकर तावडे सोबतचा व्हिडिओ शेअर करत याबद्दलचा खुलासा केला आहे. यावेळी “सत्या आणि श्रावणीचं पुढे काय झालं?” ह्या शुभंकरणे विचारलेल्या प्रश्नावर रितेशने उत्तर दिले की, “ते आता आनंदी आयुष्य जगत आहेत.”
तसेच शुभंकरने या चित्रपटात सत्या आणि श्रावणीचं एकही रोमँटिक गाणं नसल्याची त्याच्या आणि प्रेक्षकांच्या मनातील नाराजी व्यक्त केली असता रितेशने चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सत्या आणि श्रावणीच्या नवीन गाण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे आता चित्रपटातील ‘वेड लावलंय’ आणि ‘सुख कळले’ या सुपरहिट गाण्यानंतर आणखी कोणतं नवीन गाणं प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी येणार आहे याची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत.