सिनेसृष्टीत बहुतांश कलाकार हे त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. परंतू काही कलाकार मात्र त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांपैकीच एक म्हणजे काही दशकांपूर्वीचा बॉलिवूड अभिनेता Vinod Mehra.
लाहोर येथे १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १०० चित्रपटांमध्ये काम केले. तर जवळपास २५ ते ३० वर्षे बॉलिवूडमध्ये त्यांनी चांगलीच कामगिरी केली. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक प्रसिध्द अभिनेत्रींसोबत काम केले.
पण त्यांच्या करियरपेक्षा खाजगी आयुष्यात अभिनेत्रींसोबत अनेकदा जोडल्या गेलेल्या नावांमुळे ते चर्चेत असायचे. विनोद मेहरा यांनी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांच्यासोबतही बऱ्याचवेळा काम केले, यादरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच हे नातं प्रेमापासून ते लग्नापर्यंत येऊन पोहोचलं. त्या दोघांनी लग्नही केले. पण त्यांनी त्यांच हे लग्न जगापासून लपवून ठेवले. परंतू जेव्हा विनोद मेहरा रेखा यांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा त्यांच्या आईने रेखा यांना सून म्हणून स्वीकारले नाहीच. तर त्यांचा अपमानही केला.
तर या घटनेची पुष्टी झाली ती लेखक उस्मान यासीर यांनी लिहिलेल्या ‘रेखा एन अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात. विनोद मेहरा यांनी त्यांच्या आईची अनेकदा समजूत घातली, पण त्या काही तयार झाल्या नाहीत. शेवटी त्यांनी रेखा यांना घराबाहेर काढले. त्यानंतर ते दोघेही वेगळे झाले.
पुढील काळात विनोद मेहरा यांच्या आईने त्यांच्या पसंतीच्या मुलीसोबत विनोद मेहरा यांचं लग्न लावून दिले. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे काहीच दिवसात विनोद मेहरा यांना हृदयविकाराचा झटका आला आणि या परिस्थितीला त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीला दोषी ठरवले. त्यामुळे अल्पकाळात त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.
दुसरीकडे ते त्यांच्या कामात लागोपाठ यश मिळवत होते. तेव्हा ते त्यांची सहकलाकार बिंदिया गोस्वामी सोबत ते डेट करत होते. त्यांच्यात एवढी जवळीक वाढली की विनोद मेहरा यांचे लग्न झालेले असूनही त्यांनी बिंदिया गोस्वामी सोबत गुपचूप लग्न केले. हे जेव्हा त्यांच्या पत्नीला समजले तेव्हा ती दोघांनाही धमक्या देऊ लागली. त्यांना घाबरून बिंदिया गोस्वामी यांनी स्वतः विनोद मेहरा यांच्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला.
काही दिवसातच विनोद मेहरा यांनी दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला आणि १९८८ मध्ये किरण यांच्यासोबत त्यांनी लग्न केले. पण हेही संसार सुख त्यांना जास्त काळ उपभोगता आले नाही. कारण लग्नानंतर पुढील २ वर्षांतच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.