ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरु झालेल्या बिग बॉस ४ च्या पर्वाचा रविवारी ८ जानेवारी रोजी समारोप झाला. या महाअंतिम सोहळ्याची स्पर्धा अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने यांच्या मध्ये रंगली. या स्पर्धकांमधून ज्याने सर्वात अधिक मतं मिळवली त्या स्पर्धकाने या ट्रॉफीवर आपल नाव कोरलं. या पार्वतील अतिशय वादग्रस्त स्पर्धकाने ही ट्रॉफी जिंकली आहे. त्या विजेत्याचे नाव आहे अक्षय केळकर.
View this post on Instagram
या खेळाणे सर्वानचेच लक्ष वेधून घेतले होते १०० दिवसाच्या या प्रवासात मनोरंजन, बुद्धी, टास्क, मेहनत या साऱ्याची जोड देऊन अक्षय केळकरने या खेळात बाजी मारली. अक्षय ने अतिशय मेहनतीने हा सामना जिंकला असून तो खूप हुशारीने खेळला त्याने कधीच कोणाच मन दुखवल नाही. अक्षयचा खेळ स्पर्धकांना पहिल्या दिवसापासूनच आवडायला लागला. अगदी बिग बॉसनेही ‘शिकारी’, ‘जादूगर’ अशा शब्दात अक्षयचे कौतुक केले होते. त्यांनी त्याच्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट केली आहे.
या पोस्ट मध्ये तो अस म्हणतो की, ”माझ्यावर इतक भरभरून प्रेम करण्यासाठी धन्यवाद. अक्षय विजयी झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक मेसेज व फोन कॉल्स केले. त्याला येणारे फोन कॉल्स अजूनही चालूच आहेत, पण अक्षय त्यांना रिप्लाय देऊ शकला नाही म्हणून त्याने ही पोस्ट केली. तो अस म्हणतो की “महाराष्ट्रातल्या” आणि “मराठी” माणसांपर्यंत पोचण्यासाठी हा लढा लढलो आणि तुमची शाबासकी ‘ती ‘ ट्रॉफीच्या स्वरूपात पोचली! काहींना मी आवडलो नाही त्यांनीही माझ्यासाठी कमेंट केल्या आहेत. ”आई म्हणते गोड पदार्थांचा गोडवा वाढवण्यासाठी त्यात चिमुटभर मीठ टाकतात… असेल…
माझ्या या गोड प्रवासात तुम्ही सुद्धा गरजेचे होतात. तुम्हालाही खूप धन्यवाद. आणि ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, तुमच्या साठी -I love You ! मी फक्त तुमचाच आहे.”