आपल्या सगळ्यांच्या तब्येतीसाठी व्यायाम, योग्य आहार या तर गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण त्यासोबतच आणखी एक गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे ‘हसणं’. डॉक्टर देखील आपल्याला नेहमीच हसत राहण्याचे सल्ले देत असतात. हसण्याने आपलं आयुष्य वाढत असं देखील म्हटलं जात. आणि हसण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच काही असेल तर ते म्हणजे मनोरंजन. टेलिव्हिजनवर अशा अनेक मालिका आहेत ज्या आपल्याला पोट धरून हसायला भाग पाडतात. असे अनेक सिनेमे देखील आहेत.
गेले १० वर्ष एक कार्यक्रम आपल्याला हसवत ठेवत आहे. हा कार्यक्रम कधीच आपल्याला हसवण्यात कमी पडला नाही. यामधील कलाकार, त्या कलाकारांनी साकारलेली प्रत्येक पात्र प्रेक्षकांना चांगलीच भावली, आणि ते प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. सुरवातीला ६ जणांच कुटुंब असलेला हा परिवार हळूहळू वाढत गेला. नंतर कित्येक वर्षांनी एक एक करत या कार्यक्रमातील एक एक सदस्य बाहेर पडत गेला. मग जणू काही त्या कार्यक्रमाची चव गेल्यासारखं झालं. आणि काही दिवसांपूर्वी त्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आणि तो कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि या कार्यक्रमाचा कॅप्टन ऑफ द शिप डॉ. निलेश साबळे. हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कधीच कमी पडले नाहीत. नंतर काही वर्षांनी अनेक नवीन कलाकार या कार्यक्रमाचा भाग झाले. पण जी मज्जा जुन्या कलाकारांमध्ये होती ती नव्या मध्ये नाही. या कार्यक्रमाचे चाहते फक्त महाराष्ट्र आणि भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. या कार्यक्रमाने फक्त मराठी कलाकारांना नाही तर बॉलिवूड मधील सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांना देखील हसायला भाग पाडले.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी कॅप्टन ऑफ द शिप डॉ. निलेश साबळे याने या कार्यक्रमाचा निरोप घेतला त्यामुळे चाहते प्रचंड नाराज होते. निलेशने कार्यक्रम सोडल्यानंतर काही दिवसातच हा कार्यक्रम देखील बंद झाला. पण आता निलेश प्रेक्षकांचं मनोरंजन आणि त्यांना खळखळून हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. पण यावेळी चला हवा येऊ द्या किंवा झी मराठी नाही तर एका वेगळ्या कार्यक्रमातून आणि एका वेगळ्या वाहिनीवरून तो आपल्यासमोर येत आहे. कलर्स मराठीवर सध्या नवनवीन कार्यक्रमाची सरबत्ती सुरु आहे. अशातच निलेश साबळे आता या वाहिनीवर ‘हसताय ना… हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम घेऊन येत आहे. या कार्यक्रमात निलेश सोबत विनोदाचा बादशहा भाऊ कदम आणि विनोदवीर ओंकार भोजने देखील सगळ्याचं मनोरंजन करायला येत आहेत. या तिघांसोबतच स्नेहल शिदम, सुर्वणा श्याम आणि रोहित चव्हाण हे कलाकार देखील दिसणार आहेत. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन, लेखन आणि दिग्दर्शन निलेश साबळे स्वतः करणार आहे. येत्या २० एप्रिल पासून शनिवार, रविवार हा कार्यक्रम आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता चाहते देखील प्रचंड उत्सुक झाले आहेत.