१९७९ मध्ये आलेल्या ‘सिंहासन’ या चित्रपटाला आज ४४ वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मानावर चांगलीच छाप पडली आहे. मनोरंजनसृष्टीत नेहमीच सामाजिक, आर्थिक व राजकीय गोष्टींवर भाष्य करणारे मराठी सिनेमे बनवले जातात आणि बऱ्याच वेळा ते चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरतात. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘सिंहासन’ हा आहे. या चित्रपटाला ४४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात अभिनेते नाना पटेकर यांनी एका खास गोष्टीचा खुलासा केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ लेखक जब्बार पटेल, लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर, खासदार सुप्रिया सुळे अशा दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. माहिती नसलेले अनेक किस्से लोकांना ऐकायला मिळाले. ‘सिंहासन’ या चित्रपटाच्या संबंधित अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी सांगितलेला किस्सा मात्र सर्वांचा चर्चेचा विषय ठरला. ते त्यांच्या अत्यंत रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. ते त्यांचे विचार अगदी स्पष्टपणे मांडतात. व एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटत हे देखील बिनधास्तपणे सांगतात.
या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर म्हणाले, ”एक काळ असा होता की, मी नसिरुद्दीन शहा यांचा अपघात व्हावा असा देवाकडे नवस केला होता. त्यांचा अपघात व्हावा त्यांचा हात किंवा पाय मोडावा असं मी म्हणत असे. याचं कारण असं होतं की, त्यांच्याकडे असलेल्या भूमिका मला मिळाव्या. पण असं कधीच झालं नाही. आणि त्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला असंही त्यांनी म्हटलं आहे. हा किस्सा त्यांनी अगदी गमती जमतीमध्ये सांगितला. नंतर ते अस ही म्हणाले की, ज्याच्या नशिबात आहे ते त्याच्याच पदरी पडते. मला नंतरच्या काळात देवाने खूप काही दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
नाना व नसिरुद्दीन शहा हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यावेळी नसिरुद्दीन शहा यांच्याकडे खूप काम येत होते. दिग्दर्शक सुद्धा त्यांना चित्रपटात घेण्यासाठी अत्यंत उत्सुक असायचे. त्यांचे चित्रपटही चांगलेच गाजायचे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडायचा. नानां बद्दल बोलायचे झाले तर ते दखिल एक उत्तम नट म्हणून ओळखले जातात. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्यांनी गंभीर भूमिकेपासून ते विनोदी भूमिकेपर्यंत सगळ्याच क्षेत्रात अत्यंत उत्तम अशी कामगिरी निभावली आहे.