सध्या सिनेसृष्टीत अनेक कलाकारांना लग्नाचे वेड लागले आहे. यंदा अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकले आहेत. तर आता प्रसिध्द गायिका आर्या आंबेकरच्या लग्नाची देखील चर्चा सुरू झाली आहे.
काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स‘ या रिॲलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेली ही गायिका. तेव्हा तिने लहान वयात देखील अनेकांची मने जिंकून घेतली होती. आता तर तिच्या आवाजाचे आणि गाण्याचे लाखो दिवाणे आहेत. त्यामुळे तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. तिने फक्त गायिका म्हणूनच नाही तर अभिनेत्री म्हणून देखील उत्तम कामगिरी केली आहे.
आर्या केवळ तिच्या कामामुळेच नाही तर तिच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्यामुळे देखील बरीच लोकप्रिय आहे. तिच्या लग्नाच्या होणाऱ्या चार्चांवर ती आतापर्यंत काहीही स्पष्टपणे बोलली नव्हती. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने खूपच गमतीशीर उत्तर दिले आहे.
यावेळी आर्या आंबेकर म्हणाली की, “अरे, मी यावर्षी लग्न करत नाही. या सर्व मागची मोठी गुन्हेगार व्यक्ती म्हणजे कार्तिकी गायकवाड. आमच्या पाच लिटिल चॅम्प्सपैकी कार्तिकी गायकवाड जिने लग्न केलं. तिने लग्न केल्यामुळे आता सर्वजण तू लग्न कर, तू लग्न कर म्हणून माझ्या मागे लागलेत. त्यांना माझ्याबद्दल काहीही कळत नाही, म्हणून ते अशा अफवा पसरवतात. माझा लग्नाचा वैगरे आता काहीही विचार नाही.”
आर्याने जरी या सर्व अफवा आहेत असं सांगितले असले तरी, तिचे सर्वच चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.