अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. तर आता ती तिच्या लग्नामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळी ही एक उत्तम अभिनेत्री आहे, तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली. प्राजक्ताने नुकताच तिचा स्वतःचा दागिन्यांचा ‘प्राजक्तराज’ हा ब्रँड सुरु केला आहे.
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत प्राजक्ताला लग्नाबद्दल विचारण्यात आले असता ती म्हणाली होती की, “मी लग्नाला तयार आहे पण माझी एक अट आहे”. दोन वर्षांपूर्वीच्या प्राजक्ताने तिच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
View this post on Instagram
तसेच ती पुढे म्हणाली की, “माझ्या कुटुंबाने माझ्या लग्नाची तयारी जवळपास केली आहे. घरात लग्नाची तयारी सुरु आहे. पण अजूनही नवरदेव भेटणं बाकी आहे. माझ्या लग्नासाठी आईने दागिन्यांची खरेदी वैगरेही सुरु केली आहे. पण मला नवरा मुलगा मिळाला की मी लग्न करेन. पण केव्हा हे माहिती नाही. मला निर्व्यसनी मुलगा हवा आहे, हीच माझी पहिली अपेक्षा आहे. माझा होणारा नवरा हा निर्व्यसनी असावा, हीच माझी अट आहे.” असे तिने यावेळी सांगितले होते.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता श्री. रवी शंकर यांच्या आश्रमात गेली होती. त्यावेळी तिने त्यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला, “लग्न करण गरजेचं आहे का?” यावर श्री रविशंकर यांनी उत्तर दिलं की, “तू मला विचारत आहेस. असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही. खूश राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करुन खूश राहा किंवा एकटं खूश राहा. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात. तसेच एकटं राहिले तरी दुःखीच असतात. तुम्ही निवडा तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे. आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.”
प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तर या सर्व प्रकारामुळे प्राजक्ता आता कधी लग्न करणार आणि कोणासोबत करणार याबद्दल सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.