‘तुझ्यात जीव रंगला’ या गाजलेल्या मालिकेतून नावारूपाला आलेला अभिनेता म्हणजेच हार्दिक जोशी. या मालिकेतील अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकून घेत तो घराघरांत पोहचला. प्रेक्षकांना मराठी कालाकाराचं वैयक्तिक आयुष्य कस आहे? मालिका आणि सिनेविश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे.
मराठी सिनेसृष्टीत सध्या नवनवीन नाटक, सिनेमे व रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. तसेच आता ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात एका नवीन रिअॅलिटी शोची घोषणा करण्यात आली. या शोच्या माध्यमातून सर्वांचा लाडका अभिनेता हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच देखील स्पष्ट झाल आहे. झी मराठीवर सुरू होणाऱ्या या नव्या शोचा प्रोमो रिलीज झाला असून प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये एक शहरात राहणारी तरुणी गावात गेली असून तिथलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. यात ती शेण सारवताना दिसते. तिचा हा प्रयत्न पाहून “शेणाणं घर सारवणं, नेलपॉलिश लावण्याइतक सोप्पं नसतं.” ‘जाऊ बाई गावात’ असं या शोच नाव असून या शो च्या माध्यमातून शहरात ऐशोआरामात वाढलेल्या मुली ग्रामीण आयुष्य जगू शकतील का? असं दाखवण्यात आल आहे. त्यामुळे हा शो पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अगदीच शिगेला पोहचली आहे.
सुरुवातीला जाऊ बाई गावात शो २७ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता असल्याचे सांगितले होते, पण या कार्यक्रमामुळे ‘नवा गडी नवं राज्यं’ या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली होती. परंतु, प्रदर्शित होण्यापूर्वीच या नव्या रिअॅलिटी शोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून राणादाच्या कमबॅकमुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.