मराठी सिनेसृष्टीतील फुलपाखरू म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. तिने २०१३ मध्ये दुर्वा या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनतर झी युवा वरील फुलपाखरू या मालिकेतील तिच्या वैदेही या भूमिकेमुळे घराघरात पोहचली.
तसेच सध्याची तिची सर्वाधिक चर्चेतील मालिका म्हणजे झी मराठी वरील मन उडू उडू झालं. त्यातील हृताची दीपिका ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यात आणखी भर म्हणजे तिचे साध्याचे प्रचंड लोकप्रिय ठरलेले अनन्या आणि टाइमपास ३ हे चित्रपट. यासर्वांमुळे हृता बरीच चर्चेत असते.
यंदाच हृता लग्नबंधनात अडकली आहे. हृताने मागील डिसेंबर महिन्यात प्रतिक शाह सोबत साखरपुडा केला आणि त्यानंतर १८ मे रोजी ते दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांचे लग्नाचे फोटोज् आणि व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
लग्नानंतर हृताच्या पोस्टवर नेटकरी निरनिराळ्या प्रकारच्या कॉमेंट करताना दिसत होते. तेव्हा तिने ट्रोलर्सना खूप शांततेने तिने उत्तर दिले की, “मला ते अजिबात पटत नाही, ट्रोलिंग फक्त माझ्या बाबतीत होते म्हणून नाही तर कोणाच्याही बाबतीत ते नाही झाले पाहिजे. तुम्ही जेव्हा सोशल मिडियावर बोलता तेव्हा तुम्ही विचार करायला हवा, लग्नानंतर तर याच प्रमाण वाढलं आहे. मी वाचलं की – प्रतिकच्या सांगण्यावरून हृता नाटक आणि मालिका करत नाही, तर तसं काहीच नाही आणि मी माझ्या करियर मधून ब्रेक घेतलेला नाही.”