भारतात असे अनेक कलाकार आहेत जे फक्त काही मिनिटांसाठी कोट्यावधी रुपय घेतात. पूर्वीचे कलाकार फक्त काही हजार रुपयांमध्ये काम करायचे पण आता सगळं बदललं आहे. बॉलिवूडमध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या एका सिनेमासाठी १०० कोटी इतके मानधन घेतात. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार याचं सहज नाव घेतलं जात. पण यांच्यापेक्षाही जास्त मानधन घेणारा एक अभिनेता बॉलीवूडमध्ये आहे.
२०२२ मध्ये रिलीज झालेल्या एस एस राजमौली यांचा ‘आर आर आर’(RRR) या सिनेमाने फक्त भारतातच नाही, तर भारताबाहेरही धुमाकूळ घातला. हा सिनेमा भारतामध्ये तर सुपरहिट ठरलाच, पण भारताबाहेरही या सिनेमाने प्रेक्षकांवर जादू केली. भारतातील सगळ्यात महागड्या सिनेमांच्या यादीत या सिनेमाचं नाव येत. सिनेमा बनवण्यासाठी जवळपास ३३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. भारतात या सिनेमाने बक्कळ कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाच, पण त्याप्रमाणेच जपानमध्ये देखील या सिनेमाने बक्कळ कमाई केली. सिनेमातील प्रत्येक कलाकारांच भरभरून कौतुक झालं. प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर उचलून धरल. सिनेमा तर हिट झालाच, पण त्याचबरोबर यामधील गाणी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या सिनेमातील ‘नाटू नाटू’या गाण्याला जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार ‘ऑस्कर’ने सन्मानित करण्यात आले. या सिनेमाची स्टार कास्ट देखील तगडी होती. राम चरण, ज्युनिअर एन टी आर आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत दिसून आले होते.
या सिनेमात अजय देवगण (Ajay Devgan) देखील झळकला आहे. अजयने या सिनेमामध्ये फक्त ८ मिनिटांचा रोल केला आहे. यामध्ये त्याने राम चरणच्या छोटया भावाची म्हणजेच ‘अल्लूरी वेंकटराम’ही भूमिका साकारली होती. त्याने ८ मिनटांच्या भूमिकेसाठी तब्बल ३५ कोटी इतक मानधन आकारल्याच समोर आलं आहे. अद्याप याबद्दल अजय किंवा राजमौली यांच्याकडून काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. अजय हा सलमान, शाहरुख पेक्षाही जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. अजय सोबतच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने देखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर आलियाने तिच्या या भूमिकेसाठी ९ कोटी इतके मानधन स्वीकारल्याच समोर आलं आहे. आलिया आणि अजय यांचा हा पहिलाच तमिळ सिनेमा होता.