आपल्या दमदार अभिनयाने मराठी सिनेसृष्टीतील एक काळ गाजविणारे अभिनेते म्हणजे ‘भरत जाधव.’ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नाटके, सिनेमे आणि मालिका केल्या. त्यातून त्यांना लोकांचे भरभरून प्रेम मिळावले.
वयाची पन्नाशी गाठत असले तरी भरत जाधव सध्या मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. त्यांच्या सिनेमांना आजही तेवढीच प्रसिद्धी मिळत आहे तर नाटकांचे प्रयोगही हाऊसफुल होत आहेत. ते आणि त्यांचा संपूर्ण परिवार मागील काही महिन्यांपासूनच रत्नागिरीत स्थायिक झाले. त्यांनी अचानक मुंबई सोडली, त्यामुळे अनेकांनी त्यामागील खरे कारण काय? असे विचारले.
काही दिवसांपूर्वी भरत जाधव यांनी या गोष्टीचा खुलासा करत म्हणाले की, “मुंबई हे शहर आता बिझनेस हब झाले आहे. मुंबईच्या सध्या असलेल्या वेगाशी जुळवून घेणे मला कठीण वाटत आहे. त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझे वय सरत चालले आहे. परंतु आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे, म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पैसे तर कमवायचे, पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो.”
सध्या भरत जाधव यांच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीतच सुरू आहे. यादरम्यान भरत जाधव यांना खूप वाईट अनुभव आला. त्यामुळे त्यांनी रत्नागिरीत पुन्हा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला. ऐन नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान प्रेक्षकांसमोर हात जोडून या गोष्टीचा खुलासा केला. रत्नागिरीतल्या नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टिंमवरून भरत जाधव नाराज झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रेक्षकांसमोर हात जोडत म्हणाले की, “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा, याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात यामुळे मी रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही.” त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील आता निराशाजनक वातावरण पसरले आहे.