असं म्हणतात लहानपणी एखादी गोष्ट घडली की ती कायम मनात घर करून राहत असते. ती गोष्ट जर आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल असेल तर आपण ती कधीच विसरत नाही तर ठेच लागल्याप्रमाणे आयुष्यभर ती गोष्ट आपल्याला लक्षात राहते. असेच काहीसे Renuka Shahane यांच्यासोबत घडले आहे.
प्रेक्षकांचा ऑल टाइम फेवरेट ‘हम आपके है कौन‘ या सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे “Renuka Shahane”. रेणुका त्यांच्या कामासहित त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत राहिल्या आहेत. रेणुका या सार्वजनिकरित्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं बऱ्याचदा टाळताना दिसतात.
यांच्यासोबत रेणुका यांनी पहिलं लग्न केले होते. त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकले नाही. शेवटी त्यांनी घटस्फोट घेतला. शिवाय रेणुका लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता आणि आता त्यांचाही झाल्यामुळे लग्न आणि लग्नबंधनात बांधल्या जाणाऱ्या नात्यावरचाच विश्वास उडाला होता.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. तेव्हा रेणुका यांनी सांगितले की, “माझे आईवडील जेव्हा विभक्त झाले त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर झाला. तेव्हा आजूबाजूचे लोक आपल्या मुलांना माझ्यासोबत खेळण्यापासून रोखायचे. इतकंच नव्हे तर शिक्षकांनीही माझ्यासोबत असंच काहीसं केलं होतं. त्रिभंगामध्ये त्या चिमुकल्या मुलीसोबत जो सीन घडतो, ज्यामध्ये तिला तिच्या आईबद्दल विचारलं जातं, ते खरोखर माझ्या आयुष्यात घडलं आहे.”
परंतू प्रत्येक परिस्थिती बदलत असते, तशी त्यांचीही बदलली. कारण त्या आता आशुतोष राणा यांच्या प्रेमात पडल्या होत्या आणि त्यांनी लग्नही केले. त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना रेणुका म्हणाल्या की, “माझं पहिलं लग्न विजय केंकरेसोबत झालं होतं. आमचा घटस्फोट झाला.
आपण आशुतोष राणांच्या प्रेमात पडल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. “परंतु दुसऱ्या लग्नावेळी माझं वय ३५-३६ झालं होतं. त्यावेळी मी नात्यातील चढ उत्तरांना चांगल्या प्रकारे हाताळू शकत होते. आपण गाजावाजा न करता मंदिरात अगदी साध्या पद्धतीने लग्न केले” अस रेणुका म्हणाल्या.
आता रेणुका आणि आशुतोष यांना दोन मुले असून त्या दोघांचा संसार अगदी सुखात चालू आहे.