मालिका विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांमध्ये आणि खास करून पडद्यावरील गाजलेली जोडी म्हणून लोकप्रियता मिळाली ती राणा दा आणि अंजली बाई यांना, म्हणजेच आपला लाडका अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya deodhar). तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून हार्दिक आणि अक्षया महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली.
काही महिन्यांपूर्वी अक्षया आणि हार्दिकने लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता नुकतेच ते त्यांच्या अभिनय क्षेत्राकडे वळाले. लग्नानंतर सर्वात आधी कामा करताना दिसला तो हार्दिक. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या जाऊ बाई गावात या शोमधून हार्दिक पुन्हा एकदा त्याच्या लाडक्या चाहत्यांचे मन जिंकायला आला. अभिनेता म्हणून कायम प्रेक्षकांचं मन जिंकणारा हार्दिक या शोमधून पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या या नवख्या भूमिकेला प्रेक्षकांकडून देखील भरभरून प्रेम मिळत आहे.
View this post on Instagram
जाऊ बाई गावात या शोमध्ये शहरातून आणि काही परदेशातून आलेल्या मुली बावधन या खेडेगावात राहायला आल्या असून गावची आणि खास करून महाराष्ट्राच्या मातीशी तुटत चाललेली त्यांची नाळ या शोमधून पुन्हा एकदा जोडली जाणार हे नक्की. ही नाळ आणखी घट्ट करून द्यायला त्यांचा प्रत्येक दिवस एक नवखी मोहीम घेवून त्यांच्या समोर उभा असतो. अन् त्यांना एक घरचा माणूस आणि भावासारखा पाठीराखा म्हणून साथ मिळते ती या शोच्या सूत्रसंचालकाची म्हणजेच हार्दिक जोशीची. आता मकरसंक्रांत निमित्त पोस्टमनच्या भूमिकेतील एक खास मोहीम या मुलींनी पार पाडली. पण दिवसाच्या शेवटी मात्र या सर्वांसाठी त्यानाही त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून पत्र मिळाले, ते ऐकून सारेच आज भावूक झाले.
यादरम्यान आणखी एक खास गोष्ट घडली ती म्हणजे यावेळी अक्षयाने तिथे येऊन सर्वांना सरप्राईज दिले. तसेच तिने येताना साऱ्यांसाठी तिळगुळ देखील आणले होते. मुलींसोबतच हार्दिकसाठी देखील ही मोहीम खूप खास ठरली, त्याचे कारण म्हणजे त्याच्यासाठी देखील पोस्टमन काका एक खास पत्र घेऊन आले होते. यावेळी नेहमीप्रमाणे अभिनेता सागर कारंडे पोस्टमन काकांच्या भूमिकेत आला. तेव्हा त्यांनी हार्दिकसाठी आणलेलं पत्र ऐकून साऱ्यांचेच डोळे पाणावले. कारण या पत्रात हार्दिकच्या खूप जवळच्या व्यक्तीच्या मनातील भावना होत्या. हार्दिकने मागे स्वतः सांगितल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी त्याच्या वाहिनीचे निधन झाले. याबाबत सांगताना त्याने पोस्ट केली होती, तेव्हा त्याने लिहिले की, “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस पण तूझ अस्तित्व आमच्यात कायम राहील..जाऊ बाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झाल तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की 4 डिसेंबर च्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरऊन तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे. आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल. Miss you @jyoti.naisha माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको. Always love you always khup khup miss you.”
तर आता या मोहीमेदरम्यान आलेलं पत्र ऐकून शो सुरु असतानाचा हार्दिक प्रचंड भावूक झाला. तेव्हा तो म्हणाला की, “मी ठरंवलंच होतं की, शो जो करेन जो फक्त आणि फक्त तिच्यासाठीच करीन. कारण की बरोबर शो ज्या दिवशी आपला ऑन एअर गेला ४ डिसेंबरला त्याच्या बरोबर एक महिना आधी आपले प्रोमो लॉन्च झाले होते शोचे. आणि त्याच्या सकाळीच कळलं मला की, असं असं होणार आहे. मला माहिती होतं की, प्रोमो आता काही तासानंतर ऑन एअर जाणार आहेत . म्हणून मी पटकन फोन घेतला आणि फोन केला, झी च्या सगळ्या सिनीअरला फोन केला की, अशी अशी माझ्या घरात सिच्युएशन आहे. मी नाही करु शकत शो. तुम्ही तो प्रोमो थांबवा माझ्यामुळे तुमचं नुकसान नको.”
तसेच पुढे तो म्हणाला की, “खूप वाईट कंडिशनमध्ये होती ती पण तिला कळत होतं. ऑक्सिजन होता तोंडावरती तिच्या तिला बोलता येत नव्हतं. मला बोलवलं माझा हात हातात घेतला आणि तिने फक्त एवढंच केलं की, माझी शप्पथ आहे तुला शो सोडू नकोस. असं हावभाव करुन सांगितलं तिने. पण नशिबाचा खेळ असा की, ती शो बघायला नव्हती. पण एक समाधान आहे की, पहिल्या एपिसोडचे फोटो तिने बघितले. त्या दिवशी दुपारीच मला कळलं की, असं असं काहीतरी होवू शकतं आणि मी रिक्वेस्ट करुन गेलो की, असं असं आहे आता, तर सकाळी साडे आठ च्या दरम्यान कळलं की, ती आता नाहीये.”
शेवटी हार्दिकने सांगितले की, “ती नेहमी मला म्हणायची की, तु खूप मोठा कलाकार होणार. मोठा होईन की नाही माहित नाही. पण मी तिला नक्की प्रॉमिस करायचो दरवेळी की,मी चागंला कलाकार होवून दाखवेन नक्की तुला. आणि तिला दिलेला शब्द मी नेहमीच पुर्ण करत राहीन आणि तिला दिलाय मी शब्द की, मी माझ्या पुतणीची काळजी घेईन मी माझ्या भावाची काळजी घेईन. आजपर्यंत त्यांनी मला संभाळंल. प्रत्येक क्षणामध्ये जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. तेव्हा तिने मला सगळं दिलं.”
तर हा भाग प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा होता. तसेच हार्दिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.