आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी व महाराष्ट्रातील घराघरात आपले स्थान आढळ करणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या लोकप्रिय झालेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊ. तिने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या आहेत.
मृण्मयीने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्राला सुरुवात केली असून तिची पहिली मालिका ‘कुंकू’ ही असून या मालिकेत तिने ‘जानकी’चे पात्र साकारले होते. या मालिकेतून तिने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. तिने मालिकांनपासून नाटक, चित्रपट, वेब सिरीज या सर्वच क्षेत्रात अगदी उत्तम कामगिरी करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तिने केलेल्या काही चित्रपटांपैकी तिच्या काही भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘अग्निहोत्र’ या मालिकेत सुद्धा तिने काम केल होते.
मृण्मयीने अगदी उत्तम प्रकारे सादर केलेल्या काही चित्रपटांनमधील तिच्या भूमिकांबद्दल आपण जाणून घेऊया…
मोकळा श्वास –
अनुराधा वैद्य यांच्या ‘चौफुला’ या कादंबरीवर आधारित असलेल्या ‘मोकळा श्वास’ या चित्रपटात स्त्रीभ्रूण हत्त्या याबद्दल कथा दाखवण्यात आली आहे. मृण्मयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून तिने यामध्ये एका मोठ्या मुलीची भूमिका निभावली आहे. जिचा बाप मुलगा हवा या हव्यासापायी आपल्या तिन्ही मुलींचा द्वेष करतो. यामध्ये तिने कुसुमची भूमिका साकारली आहे.
नटसम्राट –
‘नटसम्राट’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला असून गणपत रामचंद्र बेलवलकर यांच्या जीवनावर आधारित असून त्यांना नाट्यसृष्टीतील महत्वाचे नट म्हणून ओळखले जाते. त्यांची मुलगी विद्या बेलवलकर हिचे पात्र मृण्मयीने साकारले आहे. तसेच नाना पाटेकर देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.
कट्यार काळजात घुसली –
सचिन पिळगावकर, सुबोध भावे आणि शंकर महादेवन ह्यांनी मुख्य भूमिका साकारलेला चित्रपट म्हणजेच ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात मृण्मयी देशपांडे असून तिचा हा चित्रपट एक ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात तिने चांगलीच भूमिका साकारली होती. या चित्रपटातील उमा म्हणजेच पंडित भानू शंकर शास्त्री यांच्या मुलीची भूमिका मृण्मयीने साकारली होती.
फर्जंद –
फर्जद हा चित्रपट इतिहासावर आधारित असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील एक सुवर्ण कथा उलगडण्यात आली आहे. त्या काळचे कोंडाजी फर्जद यांनी पन्हाळा गड कसा काबीज केला हे दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये मृण्मयीने साकारलेल्या केसरच्या भूमिकेत तिच्या मदतीने पन्हाळ गड काबीज करणे सोपे झाले होते.