बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकार होते जे आजही आपल्या लक्षात आहेत. कलाकारांसोबतच खलनायक देखील प्रचंड प्रसिद्ध होत असतात. त्यांचा असा एक वेगळा चाहतावर्ग असतो. जितका मोठा चाहतावर्ग हा अभिनेत्यांचा असतो तितकाच मोठा चाहतावर्ग हा खलनायकांचा असतो. त्यांना देखील प्रचंड लोकप्रियता मिळत असते.
असेच एक प्रचंड लोकप्रिय आणि दिग्गज कलाकार म्हणजे ‘ओम शिवपुरी’. ओम शिवपुरी हे बॉलीवुडमधील एक प्रसिद्ध खलनायक होते, त्याचबरोबर ते एक दिग्दर्शक देखील होते. १९९० मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ७० च्या दशकात प्रत्येक सिनेमात ते दिसायचेच. कधी खलनायकाच्या भुमिकेत तर कधी सहाय्यक अभिनेत्याच्या भुमिकेत ते दिसून आले होते. त्यांचे जवळपास प्रत्येक सिनेमे हिट व्हायचे. त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
‘ओम शिवपुरी’हे आधी एका रेडीओ स्टेशनवर काम करायचे. तिथेच त्यांची भेट सुधा
यांच्याशी झाली होती. आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झाले. घरच्यांच्या नकाराला होकारात बदलवत त्यां दोघांनी लग्न केले. दोघांनाही सिनेमे आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. लग्नानंतर ते दोघेही दिल्लीला स्थलांतरित झाले होते. दिल्लीला आल्यानंतर ओम शिवपुरी यांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’इथे अॅडमिशनघेऊन ते ग्रॅज्युएट झाले होते. त्यानंतर ओम आणि सुधा या दोघांनी मिळून एक ड्रामा ग्रुप बनवला होता, यातील अनेक नाटकांचे दिग्दर्शन हे स्वतः ओम शिवपुरी यांनी केले होते.
१९७१ मध्ये ओम शिवपुरी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. ‘आषाढ का एक दिन’हा त्यांचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर ते मुंबई ला स्थलांतरित झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण १७५ सिनेमे केले, यामधील अनेक सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भुमिका पार पाडल्या. राजेश खन्ना यांच्या सोबत त्यांनी एकूण ३१ सिनेमांमध्ये काम केले होते. त्यांनी इतक्या सिनेमांचे चित्रीकरण पूर्ण करून ठेवले होते की त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे जवळपास 12 सिनेमे प्रदर्शित झाले होते.
वीरू दादा (१९९०), द ओन्ली फोटोग्राफ इन फोटोफ्रेम (पाहुण्या कलाकाराची भूमिका), खूनी रात (१९९१), नरसिंह (१९९१), शांती क्रांती (१९९१), रुपे दस करोड (१९९१), हमला (१९९२), झुल्म की हुकूमत (१९९१), किस में कितना है दम (१९९२), युगंधर (१९९३), पोलीस (१९९३), आखरी संघर्ष (१९९७) हे त्यांचे 12 सिनेमे प्रदर्शित झाले. ‘ओम शिवपुरी’ हे असे पहिलेच कलाकर आहेत ज्यांचे मृत्यूनंतर इतके सिनेमे प्रदर्शित झाले होते.