भारतीय टेलिव्हिजन वरील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि सगळ्यांचा आवडता रिऍलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ (Big Boss). बिग बॉसच एक पर्व संपलं की पुढच्या पर्वाची चाहते अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात बिग बॉसचा मोठा चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस हिंदीचा १७ वे पर्व संपलं. या पर्वाच्या ट्रॉफीवर स्टँडअप कॉमेडीयन मुनव्वर फारुकीने आपले नाव कोरले. जसे बिग बॉसचे चाहते आहेत, तसेच बिग बॉस ओटीटीचे देखील मोठ्या प्रमाणत चाहते आहेत.
आतापर्यंत बिग बॉस ओटीटीचे दोन पर्व होऊन गेले आहेत. आता चाहते तिसऱ्या पर्वाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस ओटीटीचं पहिलं पर्व चालेल की नाही यात जरा शंकाच होती. पण पहिल्या पर्वात भाग घेतलेल्या अनेक कलाकारांनी आणि गायकांनी हे पर्व गाजवून दाखवले. या पर्वात अनेक मोठमोठे तसेच अनेक छोटे कलाकार देखील होते. त्या सोबतच गायक देखील होते. या सगळ्यांनी मिळून हे पर्व हिट केले. पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याने केले होते. करणने पहिल्यांदाच बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती, आणि त्याने ती उत्तमपणे पार पाडली. त्याचे सूत्रसंचालन देखील सगळ्यांना आवडले होते. या पर्वाची विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवाल ठरली होती. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिव्या ही शो मध्ये अगदी पहिल्या दिवसापासून एकटी खेळत आली होती.
बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात मात्र वेगळं काही तरी पाहायला मिळालं. या पर्वात पहिल्यांदाच युट्युबर आणि इन्फ्लुअन्सर यांना संधी देण्यात आली होती. या पर्वात पूजा भट्ट, युट्युबर अभिषेक मलहान, एल्विश यादव, मनीषा राणी, जिया शंकर यांसारखे मोठमोठे कलाकार आणि मोठमोठे युट्युबर आणि इन्फ्लुअन्सर यांनी सहभाग घेतला होता. हे पर्व पहिल्या पर्वापेक्षा देखील जास्त गाजले. या पर्वात देखील अनेक गमतीजमती, भांडण, राग, रुसवे सगळं काही पाहायला मिळालं. पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या पर्वाने एक इतिहास रचला आणि ते म्हणजे पहिल्यांदाच एक वाईल्ड कार्ड स्पर्धक बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरून गेला. या आधी बिग बॉसच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं. युट्युबर एल्विश यादव याने बिग बॉसच्या घरात एक वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आणि हे पर्व देखील आपल्या नावावर केले. या पर्वाचे सूत्रसंचालन सलमान खान याने केले होते.
आता चाहते आतुरतेने बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाची वाट पाहत आहेत. तर चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. येत्या १५ मे पासून बिग बॉस ओटीटीचं तिसरे पर्व सुरु होणार आहे. अध्याप या बद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण यावेळी कोण कोणते स्पर्धक असणार आणि यावेळी काय वेगळ बघायला मिळणार यासाठी चाहते खुपचं उत्सुक आहेत. तसेच यावेळी सलमान खान सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसणार की नाही यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत.